शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

प्रधानमंत्री आवास योजनेचे अभियंते मानधनावर

By admin | Updated: June 4, 2016 01:47 IST

प्रधानमंत्री आवास योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची निवड केली जाणार आहे.

आविष्कार देसाई,  अलिबागप्रधानमंत्री आवास योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची निवड केली जाणार आहे. या नवख्या अभियंत्यांना एका घरकुलाच्या बांधकामासाठी एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. अभियंत्यांची निवड करणारी बाह्य यंत्रणा नवख्या अभियंत्यांच्या खिशातून १० टक्के रक्कम वसूल करणार आहे. ग्रामीण भागातील लाभधारकांना घरकूल बांधण्यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञानही त्यांच्यामार्फत मिळणार आहे.ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमातीमधील बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येणार आहे. २०२२ सालापर्यंत सर्वांसाठी घर हे स्वप्न साकार करायचे आहे. देशातील ग्रामीण भागात चार कोटी, तर नागरी क्षेत्रांमध्ये दोन कोटी घरे बांधायची आहेत. सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये दरवर्षी दोन लाख घरांची निर्मिती करायची आहे. २०१५ या कालावधीत रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ३९०० घरे बांधण्यात आली होती. एका घरकुलासाठी एक लाख रुपये लाभार्थ्यांना देण्यात आले होते.घरकुलाचे हप्ते विहित मुदतीमध्ये देण्यासाठी, तसेच लाभार्थ्यांना घरकूल बांधकामाच्या तंत्रज्ञान, सामग्रीविषयी मार्गदर्शन आवश्यक आहे. परंतु पंचायत समितीकडे असणाऱ्या अभियंत्यांकडे मूळ कामाबरोबरच घरकूल योजनांचा अतिरिक्त कार्यभार आहे. घरकूल बांधकामासाठी हे अभियंते वेळ देऊ शकत नाहीत. त्यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांची भर्ती केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने २७ मे रोजी घेतला आहे. डोंगराळ, दुर्गम व एकात्मिक कृती आराखड्यातील जिल्हे आहेत. त्या भागातील २०० घरकुलांसाठी एक ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याची गरज भासणार आहे. सलग भूप्रदेश, आदी भागातील २५० घरकुलांसाठीही एका ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याची आवश्यकता भासणार आहे. रायगड जिल्ह्यात किती घरकुले उभारायची आहेत. हे अद्याप निश्चित नाही.