शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

स्वच्छतेसाठी नागरिकांची भेट घेऊन केले जात आहे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:10 IST

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  नवी मुंबई पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना  शहरात स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट, खतनिर्मिती यावर भर देण्यात आला आहे. नेरूळ विभाग कार्यालयाकडून सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात असून, या उपक्रमाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे. त्याअनुषंगाने शहरात विविध कामे सुरू असून, शहरात स्वच्छतेबरोबर पर्यावरणाची जपणूक करण्याच्या अनुषंगाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे. तसेच ५० किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघणाऱ्या सोसायट्यांच्या आवारातच कंपोस्ट करून खतनिर्मिती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कचरा वाहतूक सुपरवायजर, कामगार आदींच्या माध्यमातून नेरूळ विभागातील सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिकेच्या या उपक्रमाला सोसायट्यांचे पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काही सोसायट्यांमध्ये कंपोस्ट पिट बसविण्यासाठी जागेचा अभाव आहे अशा सोसायट्यांना आउटसोर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता कायम राहणार असून, महापालिकेच्या डम्पिंग ग्राउण्डवरील कचऱ्याचा मोठा भार कमी होणार आहे तसेच कचरा वाहतुकीचा खर्चदेखील कमी होणार आहे.

प्लास्टीक कारवाईतून एक लाख ४० हजारांचा दंड वसूलनवी मुंबई शहरात प्लॅस्टिकचा वापर होऊ नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी महिन्यात २६ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, एक लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच ७८ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान