शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी नागरिकांची भेट घेऊन केले जात आहे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:10 IST

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :  नवी मुंबई पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविताना  शहरात स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण, विल्हेवाट, खतनिर्मिती यावर भर देण्यात आला आहे. नेरूळ विभाग कार्यालयाकडून सोसायटी पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात असून, या उपक्रमाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात पहिल्या क्रमांकाचे स्थान अबाधित ठेवले असून, देशात पहिला क्रमांक पटकाविण्याचा निश्चय केला आहे. त्याअनुषंगाने शहरात विविध कामे सुरू असून, शहरात स्वच्छतेबरोबर पर्यावरणाची जपणूक करण्याच्या अनुषंगाने कचऱ्याचे वर्गीकरण करणे. तसेच ५० किलोपेक्षा जास्त दैनंदिन कचरा निघणाऱ्या सोसायट्यांच्या आवारातच कंपोस्ट करून खतनिर्मिती करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, कचरा वाहतूक सुपरवायजर, कामगार आदींच्या माध्यमातून नेरूळ विभागातील सोसायट्यांचे पदाधिकारी आणि सदस्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबत प्रबोधन केले जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महापालिकेच्या या उपक्रमाला सोसायट्यांचे पदाधिकारी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. काही सोसायट्यांमध्ये कंपोस्ट पिट बसविण्यासाठी जागेचा अभाव आहे अशा सोसायट्यांना आउटसोर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता कायम राहणार असून, महापालिकेच्या डम्पिंग ग्राउण्डवरील कचऱ्याचा मोठा भार कमी होणार आहे तसेच कचरा वाहतुकीचा खर्चदेखील कमी होणार आहे.

प्लास्टीक कारवाईतून एक लाख ४० हजारांचा दंड वसूलनवी मुंबई शहरात प्लॅस्टिकचा वापर होऊ नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. जानेवारी महिन्यात २६ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असून, एक लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच ७८ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान