शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

सरकारविरोधात भूमिपुत्र तरुणांचे आज शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: March 14, 2017 02:07 IST

गरजेपोटी बांधलेली घरे, नोकरी, शिक्षण व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरुण १४ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत.

नवी मुंबई : गरजेपोटी बांधलेली घरे, नोकरी, शिक्षण व इतर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरुण १४ मार्चपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी ९५ गावांमधील हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित राहणार आहेत. जवळपास पाच दशकांपासून होत असलेल्या अन्यायाविरोधात शक्तिप्रदर्शन करून सरकारला ताकद दाखविण्याचा निर्धार केला असून शासन प्रशासनासह राजकीय पक्षांचे लक्षही या मोर्चाकडे लागले आहे. आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या माध्यमातून एक महिन्यापासून नवी मुंबईमधील प्रत्येक गावामध्ये आंदोलनाविषयी जनजागृती सुरू केली आहे. सर्व प्रथम गावबैठका घेवून तरुणांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जाहीर सभा घेवून एक लढा हक्कासाठीची घोषणा देण्यात आली. रोज सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक भूमिपुत्रापर्यंत आंदोलनामागील भूमिका पोहचविण्यात आली. नेरूळ गावामध्ये आयोजित केलेल्या बैठकीला पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी उपस्थिती दर्शविली व तेव्हापासून प्रत्येक गावाच्या बैठकीमध्ये गर्दीचा नवीन विक्रम प्रस्थापित होत गेला. आता नाही तर कधीच नाहीचा नारा सुरू झाला. तरुणाईच्या प्रयत्नांना यश येवू लागले. एक महिना फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप व प्रत्यक्ष भेटीदरम्यानही फक्त व फक्त आंदोलनाची चर्चा सुरू झाली. युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्येक गाव अक्षरश: पिंजून काढले आहे. यामुळे १४ तारखेला होणारा मोर्चा व उपोषणाला विक्रमी प्रतिसाद मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनीही निर्धार मोर्चाच्या दरम्यान बेमुदत उपोषणामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले असल्यामुळे तरुणाईचे मनोबल अजून वाढले आहे. नवी मुंबईमधील प्रत्येक गावामध्ये होळी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात येते. होळीच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. करावे गावामध्ये शनिवारी आयोजित केलेल्या सभेलाही मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. होळी दिवशी नेरूळ, वाशी व इतर सर्वच गावांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून शिव शंभो मित्र मंडळाच्या सेक्टर २० मध्येही महारांगोळी काढून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष गणेश ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनीही याविषयी जनजागृती करण्यात आली. वाशी गावामधील तरुणांनी पारंपरिक वेशामध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित करून आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)