शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये पोस्टमनची कमतरता

By admin | Updated: September 30, 2015 00:16 IST

तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पनवेल : तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टपाल खात्यांतर्गत पत्र, तार, मनीआॅर्डर, मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट आदी मुख्य सेवा पुरवल्या जातात. यात तार सेवा आता बाद झाली असली तरी मनीआॅर्डर- मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट सेवेला आजही नागरिकांकडून विश्वासाने पसंती दिली जात आहे. याशिवाय शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिले, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, परमिट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहितीपत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जातात. नवीन पनवेल येथे मुख्य पोस्ट कार्यालय असून त्या अखत्यारीत खांदा वसाहत, कामोठे, पनवेल ही पोस्ट कार्यालये येतात. या चारही कार्यालयांतर्गत मोठा परिसर येत असून जवळपास साडेतीन लाखांची लोकवस्ती आहे. या पट्ट्यात एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे पत्रांची आवक - जावक जास्त असते त्याचबरोबर इतर अनेक कामांचा ताणही अधिक असतो. कार्यालयीन काम संगणकीकृत झाले असले तरी पत्र वाटपाची भिस्त पोस्टमनवरच असते. या चार कार्यालयात मिळून फक्त ३0 पोस्टमन कार्यरत असून एका एकावर पाच ते सहा सेक्टरची जबाबदारी देण्यात आली असून आजही बहुतांश पोस्टमन सायकलचाच वापर करतात किंवा पायी फिरतात. आजारपण, सुट्या यामुळे प्रलंबित कामांचा भार वाढत जातो. या कारणाने वेळेत टपाल देणे अनेकदा अशक्य होते. या परिसराला किमान ३८ पोस्टमनची आवश्यकता असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.