शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पनवेलमध्ये पोस्टमनची कमतरता

By admin | Updated: September 30, 2015 00:16 IST

तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

पनवेल : तालुक्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे टपाल खात्यातील व्यवहारांतही वाढ झाली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी टपाल खात्याला परिसरात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. टपाल खात्यांतर्गत पत्र, तार, मनीआॅर्डर, मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट आदी मुख्य सेवा पुरवल्या जातात. यात तार सेवा आता बाद झाली असली तरी मनीआॅर्डर- मनी ट्रान्सफर, स्पीड पोस्ट सेवेला आजही नागरिकांकडून विश्वासाने पसंती दिली जात आहे. याशिवाय शासकीय पत्रव्यवहार, पार्सल, महत्त्वाची कागदपत्रे, बिले, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना, परमिट, पासपोर्ट, बँकांच्या नोटिसा किंवा माहितीपत्र, न्यायालयाच्या नोटिसा, समज, निकालपत्र हे आजही पोस्टानेच पाठवले जातात. नवीन पनवेल येथे मुख्य पोस्ट कार्यालय असून त्या अखत्यारीत खांदा वसाहत, कामोठे, पनवेल ही पोस्ट कार्यालये येतात. या चारही कार्यालयांतर्गत मोठा परिसर येत असून जवळपास साडेतीन लाखांची लोकवस्ती आहे. या पट्ट्यात एलआयसी, राष्ट्रीयकृत बँका, शासकीय कार्यालयांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे पत्रांची आवक - जावक जास्त असते त्याचबरोबर इतर अनेक कामांचा ताणही अधिक असतो. कार्यालयीन काम संगणकीकृत झाले असले तरी पत्र वाटपाची भिस्त पोस्टमनवरच असते. या चार कार्यालयात मिळून फक्त ३0 पोस्टमन कार्यरत असून एका एकावर पाच ते सहा सेक्टरची जबाबदारी देण्यात आली असून आजही बहुतांश पोस्टमन सायकलचाच वापर करतात किंवा पायी फिरतात. आजारपण, सुट्या यामुळे प्रलंबित कामांचा भार वाढत जातो. या कारणाने वेळेत टपाल देणे अनेकदा अशक्य होते. या परिसराला किमान ३८ पोस्टमनची आवश्यकता असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.