शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:36 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावर कत्तल होत आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे. ही भीती लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळ संचालकांना उलवे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने, मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगितले आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात शेळ्या आणि कोंबड्यांच्या होणाऱ्या कत्तलीची तक्रार नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलद्वारे डीजीसीएकडे केली होती. हे विमान नियमांचे उल्लंघन आहे, ज्यामध्ये कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल होऊ नये, असे कुमार यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे. 

एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती (एईएमसी)चे प्रमुख असलेले सिडको उलवे नोडचे व्यवस्थापन करते. नॅटकनेक्टच्या तक्रारीला उत्तर देताना डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी एरोड्रोम ऑपरेटरला एरोड्रोमच्या परिसरात पक्ष्यांच्या हालचालींना आकर्षित करणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह सर्व क्रियाकलाप थांबवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई