शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: January 10, 2016 00:45 IST

नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार

नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. रात्री ८ पर्यंत निवडणुकीचा निकालही जाहीर होणार असल्याने नक्की कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान होत आहे. राजकीयदृष्ट्या या निवडणुकीला महत्त्व आले आहे. राष्ट्रवादीने शिल्पा कांबळे , भाजपाने सरस्वती पाटील व काँगे्रसने नूतन राऊत यांना उमेदवारी दिली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीला नवी मुंबईकरांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दाखविण्यासाठी ही जागा जिंकावी लागणार आहे. शिवसेना - भाजपाने राष्ट्रवादीकडून महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एक जागेमुळे सत्तापरिवर्तन होणार नाही, परंतु राष्ट्रवादीच्या दिघामधील चार व इतर ठिकाणच्या काही नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशा स्थितीमध्ये युतीसाठी एक जागाही महत्त्वाची ठरणार असल्याने आमदार मंदा म्हात्रे, विजय नाहटा, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागात तळ ठोकला होता. सुरुवातीला पोटनिवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले नव्हते. परंतु सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू झाल्यामुळे पूर्ण शहरवासीयांचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले गेले आहे. एक प्रभागाच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांनी हजेरी लावल्यामुळेही शहरातील पक्षाचे सर्व कार्यकर्तेही येथे तळ ठोकून होते. शेवटच्या दिवशी परिसरात पैसे वाटपाची जोरदार चर्चा होती. मतदारांना पैशांचे वाटप होत असल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरू लागले होते. यामुळे पोलिसांनीही कडक बंदोबस्त लावला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, दोन तासांनंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. रात्री ८ वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जल्लोषाची तयारीही सुरू केली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तनेरूळ प्रभाग ८८ मध्ये रविवारी पोट निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने शनिवारी रात्रीपासून परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर मतदानाची प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व्हावी, याकरिता पोलिसांतर्फे रूट मार्चदेखील काढण्यात आला. मतदान व मतमोजणी एकाच दिवशी सेंट झेवियर्स शाळेत होणार असल्याने या केंद्रापासून १०० मीटरवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.