शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

स्मार्ट सिटीच्या श्रेयावरून राजकारण

By admin | Updated: September 30, 2015 00:22 IST

स्मार्ट सिटी योजनेमध्ये नवी मुंबईच्या सहभागावरून आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.

नवी मुंबई : स्मार्ट सिटी योजनेमध्ये नवी मुंबईच्या सहभागावरून आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यामुळेच या योजनेत नवी मुंबईचा समावेश झाल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले. महापौरांनी गुणवत्तेवर व वीस वर्षांतील विकासकामांमुळेच हा बहुमान मिळाल्याचे स्पष्ट केले यामुळे व्यासपीठावरच आमदारांनी त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी व इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये चर्चासत्राचे आयोजन केले होते. नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. पण नागरिकांपेक्षा नेत्यांनीच जास्त भाषणबाजी केली. आमदार मंदा म्हात्रे यांनी स्मार्ट सिटीमध्ये नवी मुंबईचा समावेश होत नव्हता. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. नवी मुंबईचा या योजनेमध्ये समावेश झाला पाहिजे असे त्यांना सांगितल्यानंतरच आपल्या शहराचा समावेश झाल्याचे स्पष्ट केले. या योजनेत सहभाग झाला परंतु विकास करण्यासाठी पैशांची गरज असते. पैशांचे सोंग करता येत नाही. एलबीटी रद्द झाला आहे. शासनाकडून महिन्याला ५० कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात ११ कोटी रुपये मिळाले आहेत. पैशांची अडचण दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग घेवू या. पैसे मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी आमदारांच्या भाषणाचा समाचार घेतला. स्मार्ट सिटीमध्ये नवी मुंबईचा सहभाग वशिलेबाजीवर नाही तर गुणवत्तेच्या बळावर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वीस वर्र्षांत शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत. पालिकेकडे स्वत:च्या मालकीचे धरण आहे. अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र ,डंपिंग ग्राऊंड, चांगले रस्ते यामुळे स्मार्ट सिटीमध्ये सहभाग झाला असल्याची कोपरखळी आमदारांना मारली. महापौरांनीही राजकीय भाषण सुरू केल्यानंतर समोरील नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली.----------व्यासपीठावरच नाराजीमहापौर सुधाकर सोनावणे यांनी भाषणात आमदार मंदा म्हात्रेंच्या भाषणाचा समाचार घेतल्यानंतर म्हात्रे यांनी व्यासपीठावरच नाराजी व्यक्त केली. महापौरांना धारेवर धरण्यास सुरवात केली. तुम्ही वीस वर्षांत काय केले असा प्रश्न उपस्थित केला. व्यासपीठावर सुरू असलेल्या नाराजीनाट्यामुळे उपस्थितांची मात्र चांगलीच करमणूक झाली. नागरिक नाराजचर्चासत्रासाठी शहरातील अनेक दक्ष नागरिक उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे व महापौर सुधाकर सोनावणे यांच्या राजकीय भाषणांविषयी सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या वेळीही म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती. वारंवार अशा घटनांमुळे पदाधिकाऱ्यांवरचा आदर कमी होतो अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.