शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

राजकीय पक्षांना ओढा महानगरपालिकेकडे

By admin | Updated: January 12, 2017 06:22 IST

महानगरपालिकेमुळे पनवेल परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीमहानगरपालिकेमुळे पनवेल परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी महानगरपालिके च्या निवडणुकीवर लक्ष के ंद्रित के ले आहे. यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी पनवेल परिसरात फारसा उत्साह पाहावयास मिळत नाही. काही पक्षांमध्ये तर उमेदवारी घेता का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.पूर्वी नगरपरिषद फक्त पनवेल शहर, नवीन पनवेलपुरतीच होती. बाकीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होती. याबाबत शहरी मतदारांमध्ये कमालाची उदासिनता दिसून येत होती; परंतु १ आॅक्टोबरला पनवेल महापालिका स्थापन झाल्यामुळे एक वेगळा नवउत्साह संचारलेला आहे. याशिवाय या नवीन रचनेचे सर्वांच्याच मनात कुतुहल निर्माण झालेले आहे. राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक उमेदवार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच मानसिकतेत वावरत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झालेले आहे. प्रारूपबरोबर आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात मनपाची निवडणूक अपेक्षित आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या तुलनेत या रणधुमाळीला अवकाश आहे. तरीही लगीन घाई सुरू झालेली आहे. भाजपा, शेकाप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सगळ्याच राजकीय पक्षांनी महापालिकेला केंद्रित केले आहे. नेते मंडळी वसाहतीत बैठका घेण्यात व्यस्त आहेत. तसेच तिकीट आणि जागावाटपाची खलबते सुरू झाली आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत उलट स्थिती पनवेल तालुक्यात आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा जाहीरही करून टाकल्या आहे. त्यानंतर पनवेलमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. झेडपी व पंचायत समितीच्या गट आणि गणात निवडणुकीचा फिवर दिसून आला नाही. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका झालेल्या ऐकिवात नाहीत. ग्रामीण भागातील इच्छुकांची भाऊगर्दीही पक्ष कार्यालयात पाहावयास मिळत नाही. याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीकरिता पूर्वी इच्छुक असलेले उमेदवार शहरात राहात असल्याने त्यांना महापालिकेचे वेध लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात फारसा रस दिसत नाही. त्यामुळे झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीअगोदर चुरस कमी झाली आहे.पक्षांना शोधाशोध करावी लागेलशेतकरी कामगार पक्षाचा मूळ पाया ग्रामीण असल्याने त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत उमेदवार मिळतील; परंतु इतर पक्षांना मात्र शोधाशोध करावी लागणार आहे, अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. राष्ट्रवादीबरोबर लालबावट्याची आघाडी असली, तरी या निवडणुकीत उमेदवार उतरविण्यात येण्याची शक्यता कमी आहे.