शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

राजकीय पक्षांना ओढा महानगरपालिकेकडे

By admin | Updated: January 12, 2017 06:22 IST

महानगरपालिकेमुळे पनवेल परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीमहानगरपालिकेमुळे पनवेल परिसराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी महानगरपालिके च्या निवडणुकीवर लक्ष के ंद्रित के ले आहे. यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या, तरी पनवेल परिसरात फारसा उत्साह पाहावयास मिळत नाही. काही पक्षांमध्ये तर उमेदवारी घेता का? असे म्हणण्याची वेळ आली आहे.पूर्वी नगरपरिषद फक्त पनवेल शहर, नवीन पनवेलपुरतीच होती. बाकीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद होती. याबाबत शहरी मतदारांमध्ये कमालाची उदासिनता दिसून येत होती; परंतु १ आॅक्टोबरला पनवेल महापालिका स्थापन झाल्यामुळे एक वेगळा नवउत्साह संचारलेला आहे. याशिवाय या नवीन रचनेचे सर्वांच्याच मनात कुतुहल निर्माण झालेले आहे. राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुक उमेदवार गेल्या तीन महिन्यांपासून त्याच मानसिकतेत वावरत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झालेले आहे. प्रारूपबरोबर आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात मनपाची निवडणूक अपेक्षित आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या तुलनेत या रणधुमाळीला अवकाश आहे. तरीही लगीन घाई सुरू झालेली आहे. भाजपा, शेकाप, शिवसेना या प्रमुख पक्षांसह सगळ्याच राजकीय पक्षांनी महापालिकेला केंद्रित केले आहे. नेते मंडळी वसाहतीत बैठका घेण्यात व्यस्त आहेत. तसेच तिकीट आणि जागावाटपाची खलबते सुरू झाली आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत उलट स्थिती पनवेल तालुक्यात आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा जाहीरही करून टाकल्या आहे. त्यानंतर पनवेलमध्ये फारसा उत्साह दिसला नाही. झेडपी व पंचायत समितीच्या गट आणि गणात निवडणुकीचा फिवर दिसून आला नाही. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरे, बैठका झालेल्या ऐकिवात नाहीत. ग्रामीण भागातील इच्छुकांची भाऊगर्दीही पक्ष कार्यालयात पाहावयास मिळत नाही. याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीकरिता पूर्वी इच्छुक असलेले उमेदवार शहरात राहात असल्याने त्यांना महापालिकेचे वेध लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात फारसा रस दिसत नाही. त्यामुळे झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकीअगोदर चुरस कमी झाली आहे.पक्षांना शोधाशोध करावी लागेलशेतकरी कामगार पक्षाचा मूळ पाया ग्रामीण असल्याने त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत उमेदवार मिळतील; परंतु इतर पक्षांना मात्र शोधाशोध करावी लागणार आहे, अशी स्थिती सध्या तरी दिसून येत आहे. राष्ट्रवादीबरोबर लालबावट्याची आघाडी असली, तरी या निवडणुकीत उमेदवार उतरविण्यात येण्याची शक्यता कमी आहे.