शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
4
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
5
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
6
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
7
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
8
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
9
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
10
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
11
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
12
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
13
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
14
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
15
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
16
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
17
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
18
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
19
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
20
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 22, 2016 06:38 IST

आगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे

अरूणकुमार मेहत्रे / कळंबोलीआगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकरिता प्रभाग सोयीचे व्हावेत यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडून आहेत. याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेच, तसेच वेगवेगळ्या वावड्या सुध्दा उठवल्या जात असल्याने महापालिका प्रशासनाने अधिक गुप्तता बाळगली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून नैना वगळल्याने साहजिकच क्षेत्रफळ, लोकसंख्या कमी झालेली आहे. या क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाख ९ हजार इतकी लोकसंख्या आहे. ती विचार घेवून तसेच भौगोलिक रचनेच्या आधारे नवीन प्रभाग तयार करण्यात आलेले आहे. ते मंजुरीकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्यामध्ये नेमके काय दडले आहे. हे लवकरच जाहीर होणार आहे. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल परिसरात याच विषयी चर्चा सुरू आहे. पनवेलमध्ये हा भाग तोडून त्या विभागाला जोडला. नवीन पनवेलचे विभाजन करण्यात आले. आसुडगाव कळंबोलीला जोडण्यात आले. खांदा वसाहतीत एकच प्रभाग झाला. कोळखे व तक्का मिळून एक प्रभाग झाला. अशा प्रकारच्या अनेक चर्चा कानावर येवू लागल्या असल्याने प्रभाग रचनेचा अहवाल फुटला अशा प्रकारचे आरोप सुध्दा करण्यात आले. मात्र या फक्त वावड्या, चर्चा असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या सोयीनुसार प्रभाग व्हावेत यासाठी काही राजकीय मंडळींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या मैत्रीचा आधार घेण्याचा प्रयत्न सुध्दा केल्याची चर्चा आहे. परंतु डॉ. शिंदे यांनी तीन ते चार वेळा त्यामध्ये दुरूस्ती केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काटेकोर आणि कडक शिस्तीच्या आयुक्तांमुळे प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या पथकाने कुठेही वाच्यता केलेली नाही. हे काम अतिशय गुप्त व गोपनीय पध्दतीने करण्यात आले आहे. त्यामुळे नेमके प्रभाग कसे असतील याविषयी सर्वांनाच कमालीचे कुतूहल आहे. त्या फक्त चर्चा आहेत, प्रत्यक्षात प्रभाग जाहीर होतील तेव्हाच खरे काय व खोटे काय हे समजेल, असे खांदा वसाहतीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आरक्षण काहीही पडो आपल्याकडे त्याकरिता पर्याय आहेत. महिला झाले तर पत्नी, पुरूष पडले तर आपण, इतर काही आरक्षण निघाले तर मित्र, समर्थकाला उभे करू मात्र प्रभाग सोयीस्कर झाला पाहिजे कारण येथे आपले निवडून येण्यापुरते मत आहेत, असे कळंबोलीतील एका इच्छुकाने सांगितले. तर काही जुन्या जाणत्या माजी नगरसेवकांच्या मते प्रभाग कसाही होवो फरक पडत नाही. मात्र आरक्षण आपल्यानुसार पडले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच सोयीचे आणि सोयीस्कर प्रभाग व्हावेत अशी इच्छा इच्छुकांची आहे.