शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 22, 2016 06:38 IST

आगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे

अरूणकुमार मेहत्रे / कळंबोलीआगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकरिता प्रभाग सोयीचे व्हावेत यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडून आहेत. याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेच, तसेच वेगवेगळ्या वावड्या सुध्दा उठवल्या जात असल्याने महापालिका प्रशासनाने अधिक गुप्तता बाळगली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून नैना वगळल्याने साहजिकच क्षेत्रफळ, लोकसंख्या कमी झालेली आहे. या क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाख ९ हजार इतकी लोकसंख्या आहे. ती विचार घेवून तसेच भौगोलिक रचनेच्या आधारे नवीन प्रभाग तयार करण्यात आलेले आहे. ते मंजुरीकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्यामध्ये नेमके काय दडले आहे. हे लवकरच जाहीर होणार आहे. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल परिसरात याच विषयी चर्चा सुरू आहे. पनवेलमध्ये हा भाग तोडून त्या विभागाला जोडला. नवीन पनवेलचे विभाजन करण्यात आले. आसुडगाव कळंबोलीला जोडण्यात आले. खांदा वसाहतीत एकच प्रभाग झाला. कोळखे व तक्का मिळून एक प्रभाग झाला. अशा प्रकारच्या अनेक चर्चा कानावर येवू लागल्या असल्याने प्रभाग रचनेचा अहवाल फुटला अशा प्रकारचे आरोप सुध्दा करण्यात आले. मात्र या फक्त वावड्या, चर्चा असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या सोयीनुसार प्रभाग व्हावेत यासाठी काही राजकीय मंडळींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या मैत्रीचा आधार घेण्याचा प्रयत्न सुध्दा केल्याची चर्चा आहे. परंतु डॉ. शिंदे यांनी तीन ते चार वेळा त्यामध्ये दुरूस्ती केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काटेकोर आणि कडक शिस्तीच्या आयुक्तांमुळे प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या पथकाने कुठेही वाच्यता केलेली नाही. हे काम अतिशय गुप्त व गोपनीय पध्दतीने करण्यात आले आहे. त्यामुळे नेमके प्रभाग कसे असतील याविषयी सर्वांनाच कमालीचे कुतूहल आहे. त्या फक्त चर्चा आहेत, प्रत्यक्षात प्रभाग जाहीर होतील तेव्हाच खरे काय व खोटे काय हे समजेल, असे खांदा वसाहतीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आरक्षण काहीही पडो आपल्याकडे त्याकरिता पर्याय आहेत. महिला झाले तर पत्नी, पुरूष पडले तर आपण, इतर काही आरक्षण निघाले तर मित्र, समर्थकाला उभे करू मात्र प्रभाग सोयीस्कर झाला पाहिजे कारण येथे आपले निवडून येण्यापुरते मत आहेत, असे कळंबोलीतील एका इच्छुकाने सांगितले. तर काही जुन्या जाणत्या माजी नगरसेवकांच्या मते प्रभाग कसाही होवो फरक पडत नाही. मात्र आरक्षण आपल्यानुसार पडले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच सोयीचे आणि सोयीस्कर प्रभाग व्हावेत अशी इच्छा इच्छुकांची आहे.