शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

By admin | Updated: December 22, 2016 06:38 IST

आगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे

अरूणकुमार मेहत्रे / कळंबोलीआगामी पनवेल महानगरपालिकेकरिता राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असली तरी सर्व काही प्रभाग रचनेवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्याकरिता प्रभाग सोयीचे व्हावेत यासाठी इच्छुक देव पाण्यात बुडून आहेत. याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेच, तसेच वेगवेगळ्या वावड्या सुध्दा उठवल्या जात असल्याने महापालिका प्रशासनाने अधिक गुप्तता बाळगली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातून नैना वगळल्याने साहजिकच क्षेत्रफळ, लोकसंख्या कमी झालेली आहे. या क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार पाच लाख ९ हजार इतकी लोकसंख्या आहे. ती विचार घेवून तसेच भौगोलिक रचनेच्या आधारे नवीन प्रभाग तयार करण्यात आलेले आहे. ते मंजुरीकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु त्यामध्ये नेमके काय दडले आहे. हे लवकरच जाहीर होणार आहे. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष, नेते आणि इच्छुकांकडून तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल परिसरात याच विषयी चर्चा सुरू आहे. पनवेलमध्ये हा भाग तोडून त्या विभागाला जोडला. नवीन पनवेलचे विभाजन करण्यात आले. आसुडगाव कळंबोलीला जोडण्यात आले. खांदा वसाहतीत एकच प्रभाग झाला. कोळखे व तक्का मिळून एक प्रभाग झाला. अशा प्रकारच्या अनेक चर्चा कानावर येवू लागल्या असल्याने प्रभाग रचनेचा अहवाल फुटला अशा प्रकारचे आरोप सुध्दा करण्यात आले. मात्र या फक्त वावड्या, चर्चा असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. आपल्या सोयीनुसार प्रभाग व्हावेत यासाठी काही राजकीय मंडळींनी पालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर असलेल्या मैत्रीचा आधार घेण्याचा प्रयत्न सुध्दा केल्याची चर्चा आहे. परंतु डॉ. शिंदे यांनी तीन ते चार वेळा त्यामध्ये दुरूस्ती केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काटेकोर आणि कडक शिस्तीच्या आयुक्तांमुळे प्रभाग रचनेची जबाबदारी असलेल्या पथकाने कुठेही वाच्यता केलेली नाही. हे काम अतिशय गुप्त व गोपनीय पध्दतीने करण्यात आले आहे. त्यामुळे नेमके प्रभाग कसे असतील याविषयी सर्वांनाच कमालीचे कुतूहल आहे. त्या फक्त चर्चा आहेत, प्रत्यक्षात प्रभाग जाहीर होतील तेव्हाच खरे काय व खोटे काय हे समजेल, असे खांदा वसाहतीतील एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आरक्षण काहीही पडो आपल्याकडे त्याकरिता पर्याय आहेत. महिला झाले तर पत्नी, पुरूष पडले तर आपण, इतर काही आरक्षण निघाले तर मित्र, समर्थकाला उभे करू मात्र प्रभाग सोयीस्कर झाला पाहिजे कारण येथे आपले निवडून येण्यापुरते मत आहेत, असे कळंबोलीतील एका इच्छुकाने सांगितले. तर काही जुन्या जाणत्या माजी नगरसेवकांच्या मते प्रभाग कसाही होवो फरक पडत नाही. मात्र आरक्षण आपल्यानुसार पडले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. एकंदरीतच सोयीचे आणि सोयीस्कर प्रभाग व्हावेत अशी इच्छा इच्छुकांची आहे.