शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय ‘खानावळी’चा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:01 IST

ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा मतदार संघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदार संघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंद परांजपे यांच्यातच असणार आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. काठावर असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. त्यासाठी रात्रीच्या पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत.काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या महिनाभर चालणाऱ्या या खानावळीसाठी शहरातील हॉटेल्सच बुक करून ठेवल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे शहराबाहेरील फार्महाउसवरही कार्यकर्त्यांसाठी गटागटाने दारू आणि मटणांच्या पार्ट्या झडत आहेत.ठाणे लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे अनंद परांजपे यांच्यातच खरी चुरस असणार आहे. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने शिवसेना-भाजपा युतीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून विजयाच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. राष्ट्रवादीने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम वॉर्ड पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन कामाला लागण्याचे आवाहन केले. त्यानंतर गेल्या आठवड्यात शिवसेनेने पदाधिकाºयांची बैठक घेतली. ठाणे लोकसभा मतदार संघातून ९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतरच खºया अर्थाने प्रचाराचा धडका सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वी नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट बांधणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या धुरिणांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक नाराज कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी रात्रीच्या मेजवानीचे नियोजन केले जात आहे. या जेवणावळीची जबाबदारी त्या त्या विभागातील प्रमुख पदाधिकाºयांवर देण्यात आली आहे. त्यानुसार ठरावीक हॉटेल्स महिनाभरासाठी बुक करण्यात आली आहेत.सध्या या हॉटेल्समधून दिवसभरात ४० ते ५० कार्यकर्त्यांच्या पार्ट्या झडत आहेत. महत्त्वाचे कार्यकर्ते, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदीची शनिवार आणि रविवारी लोणावळा, कर्जत, खालापूर, अलिबाग तसेच मुरबाड येथील फार्महाउसवर आवभगत केली जात आहे. याचा परिणाम म्हणून या विभागात वाहनांची रेलचेल वाढल्याचे दिसून येते.निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली नसल्याने सध्या खानावळीचे स्वरूप मर्यादित आहे; परंतु १० एप्रिलपासून या पार्ट्यांचा खºया अर्थाने धडाका सुरू होणार आहे. त्या दृष्टीने प्रमुख पक्षांच्या उमेदवारींनी आतापासून नियोजन सुरू केले आहे, त्यामुळे पुढील महिनाभर तरी कार्यकर्त्यांसह त्या त्या विभागातील मतदारांवर प्रभाव टाकणाºया विविध क्षेत्रातील धुरिणांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्व वाढलेप्रचारात घोषणाबाजी आणि आंदोलनापुरते अस्तित्व मर्यादित असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढू लागले आहे. पाच वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या कार्यकर्त्यांची आता आस्थेने विचारपूस केली जात आहे. त्यांना मानाची वागणूक दिली जात आहे. उमेदवारांकडून त्यांची आस्थेने विचारपूस केली जात आहे. विशेषत: विविध कारणांमुळे नाराज असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना गोंजारण्याचे काम सध्या प्रभावीपणे सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई