शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा समन्वय वाढला

By admin | Updated: August 23, 2015 03:49 IST

शहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईशहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे शाखेने कमालीचे यश मिळवलेले आहे.नवी मुंबई पोलिसांच्या इतिहासात यंदा प्रथमच परिमंडळ व गुन्हे शाखा यांच्यात समन्वय दिसून येत आहे.नवी मुंबई पोलिसांना आलेली मरगळ झटकण्याचे काम गुन्हे शाखेने मागील वर्षभरापासून केले आहे. नवी मुंबईला लागून असलेल्या शहरातील गुन्हेगारांची पोलिसांना मोठी डोकेदुखी आहे. गुन्हे करून शहराबाहेर पळालेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा, आंबिवलीसारख्या परिसरात त्यांनी धाडी टाकल्या. काही कारवायांमध्ये गुन्हेगारांच्या प्रतिहल्ल्यालाही त्यांना सामोरे जावे लागले. परंतु काही केल्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचेच या उद्देशाने पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवले. त्यामुळे सोनसाखळी, घरफोडी व इतर गंभीर गुन्हे नियंत्रणात आले आहेत. तर घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्यामुळे चोरीचा मुद्देमालही हस्तगत झालेला आहे. सन २०१२ साली ३२२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी अवघ्या १३६ गुन्ह्यांची उकल झालेली. परंतु २०१४ मध्ये झालेल्या २९७ सोनसाखळी चोऱ्यांपैकी १६८ गुन्ह्णांची उकल गुन्हे शाखेने केलेली आहे. तर चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत ११४ घटना घडल्या असून त्यापैकी ६२ गुन्ह्णांची उकल झालेली आहे.सोनसाखळी चोरीच्या घटनाही मध्यंतरीच्या काळात वाढलेल्या होत्या. मात्र त्यावरही नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. १ आॅगस्ट २०१४ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत सोनसाखळी चोरीच्या १०१ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. त्यामध्ये ४४ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी परत मिळवून संबंधित महिलांना दिलेले आहेत. अशाप्रकारे इतर विविध गुन्ह्यातील ८ कोटी ८७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामध्ये मालमत्तेच्या अपहारासह खंडणी, फसवणूक अशांचा समावेश आहे.गेल्या महिन्यात राबवलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्येही पोलिसांनी राज्यात चौथ्या क्रमांकाचे तपासकार्य केले आहे. या अभियानादरम्यान ४६ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोचवले आहे. तर पालक न मिळालेल्या ८ बालकांना सुधारगृहात ठेवले आहे. हत्येच्या गुन्ह्णांची उकल करण्यात कसलीही कसर न सोडता पुराव्याअभावी देखील अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केलेली आहे. त्यामध्ये महिला बाल संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरण, सीबीडी स्थानकालगत आढळलेले मृतदेहाचे तुकडे, ऐरोलीचे फ्रेन्शिला वाझ हत्या प्रकरण अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचेही गांभीर्य लक्षात घेऊन उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान राबवण्यात आले.आयुक्तांची भूमिकागुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांमध्येच समन्वय असण्याची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन परिमंडळ उपआयुक्त व गुन्हे शाखा उपआयुक्त यांनी आपसात सलोखा साधलेला आहे. योग्य समन्वया साधण्यात आयुक्तांचीही भूमिका मार्गदर्शक ठरलेली आहे.इथल्या इंटरनेट सुरक्षेवरही त्यांनी भर दिला. यापूर्वी शहरातून दहशतवादी कारवाईशी संबंधित ई-मेल पाठवले गेलेले आहेत. त्यामुळे धोक्यात आलेली वायफायची सुरक्षा बळकट करण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे अभियान राबवण्यात आले.सराईत गुन्हेगारांच्या मागे लागून अनेकांची धरपकड केलेली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्णांची उकल झालेली असून त्यामध्ये पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये सामाजिक हिताच्या बाबीही जोपासण्याचे काम पोलिसांनी केलेले आहे. सहकारी अधिकाऱ्यांमध्ये साधलेला समन्वय हा तपासकामात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे.- सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा