शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

पोलिसांचा समन्वय वाढला

By admin | Updated: August 23, 2015 03:49 IST

शहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे

- सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईशहरात विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसवण्यात नवी मुंबईचे पोलिस यशस्वी ठरले आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यातही गुन्हे शाखेने कमालीचे यश मिळवलेले आहे.नवी मुंबई पोलिसांच्या इतिहासात यंदा प्रथमच परिमंडळ व गुन्हे शाखा यांच्यात समन्वय दिसून येत आहे.नवी मुंबई पोलिसांना आलेली मरगळ झटकण्याचे काम गुन्हे शाखेने मागील वर्षभरापासून केले आहे. नवी मुंबईला लागून असलेल्या शहरातील गुन्हेगारांची पोलिसांना मोठी डोकेदुखी आहे. गुन्हे करून शहराबाहेर पळालेल्या या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंब्रा, आंबिवलीसारख्या परिसरात त्यांनी धाडी टाकल्या. काही कारवायांमध्ये गुन्हेगारांच्या प्रतिहल्ल्यालाही त्यांना सामोरे जावे लागले. परंतु काही केल्या गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचेच या उद्देशाने पोलिसांनी कारवाईमध्ये सातत्य ठेवले. त्यामुळे सोनसाखळी, घरफोडी व इतर गंभीर गुन्हे नियंत्रणात आले आहेत. तर घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्यामुळे चोरीचा मुद्देमालही हस्तगत झालेला आहे. सन २०१२ साली ३२२ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यापैकी अवघ्या १३६ गुन्ह्यांची उकल झालेली. परंतु २०१४ मध्ये झालेल्या २९७ सोनसाखळी चोऱ्यांपैकी १६८ गुन्ह्णांची उकल गुन्हे शाखेने केलेली आहे. तर चालू वर्षात जुलै अखेरपर्यंत ११४ घटना घडल्या असून त्यापैकी ६२ गुन्ह्णांची उकल झालेली आहे.सोनसाखळी चोरीच्या घटनाही मध्यंतरीच्या काळात वाढलेल्या होत्या. मात्र त्यावरही नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. १ आॅगस्ट २०१४ ते ३१ जुलै २०१५ या कालावधीत सोनसाखळी चोरीच्या १०१ गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. त्यामध्ये ४४ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी परत मिळवून संबंधित महिलांना दिलेले आहेत. अशाप्रकारे इतर विविध गुन्ह्यातील ८ कोटी ८७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्यामध्ये मालमत्तेच्या अपहारासह खंडणी, फसवणूक अशांचा समावेश आहे.गेल्या महिन्यात राबवलेल्या आॅपरेशन मुस्कानमध्येही पोलिसांनी राज्यात चौथ्या क्रमांकाचे तपासकार्य केले आहे. या अभियानादरम्यान ४६ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांपर्यंत पोचवले आहे. तर पालक न मिळालेल्या ८ बालकांना सुधारगृहात ठेवले आहे. हत्येच्या गुन्ह्णांची उकल करण्यात कसलीही कसर न सोडता पुराव्याअभावी देखील अनेक संवेदनशील गुन्ह्यांची उकल केलेली आहे. त्यामध्ये महिला बाल संरक्षण आयोगाच्या माजी अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल हत्या प्रकरण, सीबीडी स्थानकालगत आढळलेले मृतदेहाचे तुकडे, ऐरोलीचे फ्रेन्शिला वाझ हत्या प्रकरण अशा अनेक गुन्ह्यांचा समावेश आहे. तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याचेही गांभीर्य लक्षात घेऊन उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान राबवण्यात आले.आयुक्तांची भूमिकागुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांमध्येच समन्वय असण्याची गरज असते. हीच बाब लक्षात घेऊन परिमंडळ उपआयुक्त व गुन्हे शाखा उपआयुक्त यांनी आपसात सलोखा साधलेला आहे. योग्य समन्वया साधण्यात आयुक्तांचीही भूमिका मार्गदर्शक ठरलेली आहे.इथल्या इंटरनेट सुरक्षेवरही त्यांनी भर दिला. यापूर्वी शहरातून दहशतवादी कारवाईशी संबंधित ई-मेल पाठवले गेलेले आहेत. त्यामुळे धोक्यात आलेली वायफायची सुरक्षा बळकट करण्यासाठी गुन्हे शाखेतर्फे अभियान राबवण्यात आले.सराईत गुन्हेगारांच्या मागे लागून अनेकांची धरपकड केलेली आहे. त्यामुळे अनेक गुन्ह्णांची उकल झालेली असून त्यामध्ये पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये सामाजिक हिताच्या बाबीही जोपासण्याचे काम पोलिसांनी केलेले आहे. सहकारी अधिकाऱ्यांमध्ये साधलेला समन्वय हा तपासकामात अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे.- सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा