शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यार्थ्यांनी जमा केला प्लास्टिक कचरा; पानथळ दिनानिमित्त उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 04:47 IST

कोलाज चित्राचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते अनावरण

नवी मुंबई : महापालिकेचे मुख्यालय सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्यात आले आहे. प्लास्टिक प्रतिबंधाच्या दृष्टीने टेरी आणि युएनईपी (संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्था) यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी पुढाकार घेतल्याचे मत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले.

टेरी व युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेन्ट आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीतील सागर विहार येथे जागतिक पाणथळ दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये टेरी संस्थेच्या संकल्पनेतून विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी तयार केलेल्या वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले.

‘प्लास्टिकविषयी पुनर्विचार’ या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक कचºयापासून तयार करण्यात आलेल्या कोलाज चित्राचे अनावरण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्य सचिव जे.एस. सहारिया, टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार माजी सनदी अधिकारी जी. एस. गील, भारत सरकारचे उच्च अधिकारी लोविश अहुजा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण तदर्थ समिती सभापती दिव्या गायकवाड, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. अंजली पारसनीस, यूएनईपीच्या प्लास्टिक प्रदूषण सल्लागार सलोनी गोयल व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहारिया यांनी रिथींक प्लास्टिक उपक्रमाचे कौतुक करून युवकांचा सहभाग लक्षणीय असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्लास्टिक प्रदुषणाविरुद्ध वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर भरीव काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केली.

टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी जी.एस. गील यांनी नवी मुंबई शहर इको सिटी बनण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने टेरी संस्था सहयोगाने काम करीत असल्याचे सांगितले. तर प्लास्टिक प्रतिबंधाबाबत एक अभिनव प्रकल्प राबविण्याबाबतही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

रिथींक प्लास्टिक संकल्पनेबद्दल बोलताना टेरी संस्थेच्या सहसंचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये पिंपळ, उंबर, वड अशा देशी वृक्षांची रोपे तयार करून त्यांचे संवर्धन करण्यातून प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्उपयोग तसेच पर्यावरण संरक्षण हे विविध हेतू साध्य होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी खारफुटीचे महत्त्वही विषद केले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांनी १०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक संकलित केले व नवी मुंबई महानगरपालिकेकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रदान केले.

उपक्रमात वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आय.सी.एल. महाविद्यालय, नेरूळचे रामराव आदिक तंत्र महाविद्यालय, एस.आय.ई.एस. महाविद्यालय तसेच इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायर्मेंट मॅनेजमेंट, एन.एस.एस.चे विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र