शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

योजना तळागाळापर्यंत पोहचल्या पाहिजेत

By admin | Updated: June 21, 2017 05:45 IST

शासकीय योजना या मर्यादित न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शेकापच्या रायगड जिल्हा महिला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शासकीय योजना या मर्यादित न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी झिराड येथे बोलताना केले. झिराड ग्रामपंचायत आणि साई क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाठारे क्षात्रैक्य समाज सभागृहात आयोजित सत्कार सोहळा आणि दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्र मात त्या बोलत होत्या. जेव्हा आपण शिखरावर जात असतो, तेव्हा आपल्या खालच्या बांधवांना साथ देणे आवश्यक असते. दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मार्गदर्शनही चित्रलेखा पाटील यांनी केले. शेकाप कायमच योग्य उमेदवारांना निवडून देते आणि असे उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, असे उद्गार जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करताना त्यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश संकपाळ, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर म्हात्रे, दिलीप भोईर, पंचायत समिती सदस्या स्नेहा म्हात्रे, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच अर्केश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शासनाच्या उपक्र मांची सविस्तर माहिती दिली. या वेळी आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. साई क्र ीडा मंडळाच्या वतीने गेली १९ वर्षे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. यावर्षीही हा उपक्र म राबविण्यात आला. शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या २५ आदिवासी बांधवांना या वेळी दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप तहसीलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या विशेष प्रयत्नांतून या आदिवासी बांधवांना दळी जमिनीच्या प्रमाणपत्र वाटपाबाबत पाठपुरावा करण्यात आला, याला यश आल्याने आदिवासी बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.