शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

योजना तळागाळापर्यंत पोहचल्या पाहिजेत

By admin | Updated: June 21, 2017 05:45 IST

शासकीय योजना या मर्यादित न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शेकापच्या रायगड जिल्हा महिला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शासकीय योजना या मर्यादित न राहता त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, असे प्रतिपादन शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख तथा नगरसेविका चित्रलेखा पाटील यांनी झिराड येथे बोलताना केले. झिराड ग्रामपंचायत आणि साई क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पाठारे क्षात्रैक्य समाज सभागृहात आयोजित सत्कार सोहळा आणि दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्र मात त्या बोलत होत्या. जेव्हा आपण शिखरावर जात असतो, तेव्हा आपल्या खालच्या बांधवांना साथ देणे आवश्यक असते. दहावी, बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांनी इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे मार्गदर्शनही चित्रलेखा पाटील यांनी केले. शेकाप कायमच योग्य उमेदवारांना निवडून देते आणि असे उमेदवार सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, असे उद्गार जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करताना त्यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर तहसीलदार प्रकाश संकपाळ, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकर म्हात्रे, दिलीप भोईर, पंचायत समिती सदस्या स्नेहा म्हात्रे, झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच अर्केश राणे व इतर मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शासनाच्या उपक्र मांची सविस्तर माहिती दिली. या वेळी आदिवासी बांधवांसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. दहावी, बारावीत उत्तीर्ण झालेल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. साई क्र ीडा मंडळाच्या वतीने गेली १९ वर्षे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षभराचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. यावर्षीही हा उपक्र म राबविण्यात आला. शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या २५ आदिवासी बांधवांना या वेळी दळी जमिनीच्या प्रमाणपत्राचे वाटप तहसीलदार प्रकाश संकपाळ आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर यांच्या विशेष प्रयत्नांतून या आदिवासी बांधवांना दळी जमिनीच्या प्रमाणपत्र वाटपाबाबत पाठपुरावा करण्यात आला, याला यश आल्याने आदिवासी बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.