शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरोध धुडकावून उद्यानात जत्रेला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:40 IST

घणसोली येथे उद्यानात जत्रेला परवानगी दिल्यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी सोमवारी पालिका आयुक्तांना धारेवर धरले. यापूर्वी त्याठिकाणी नवरात्री, गणेशोत्सवाला परवानगी नाकारणारे अधिकारी जत्रेसाठी परवानगी देतात

नवी मुंबई : घणसोली येथे उद्यानात जत्रेला परवानगी दिल्यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी सोमवारी पालिका आयुक्तांना धारेवर धरले. यापूर्वी त्याठिकाणी नवरात्री, गणेशोत्सवाला परवानगी नाकारणारे अधिकारी जत्रेसाठी परवानगी देतात, यामागे अर्थकारण असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तर नुकताच उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च झालेला असल्याने अधिकाºयांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचाही आरोप होत आहे.घणसोली सेक्टर ४ येथील उद्यानामध्ये जत्रा भरवण्यासाठी पालिकेने परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे उद्यानाच्या डागडुजीवर नुकताच झालेला खर्च पाण्यात गेला आहे. परिसरातील रहिवाशांसाठी एकही चांगले उद्यान नसल्याने स्थानिक नगरसेविका उषा पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार या उद्यानाची डागडुजी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आमदार निधी व पालिकेचा निधी असा सुमारे ३० लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगले उद्यान उपलब्ध झाले होते. अशातच पालिका अधिकाºयांनी सदर उद्यानात जत्रा भरवण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु परवान्यातून प्रशासनाला मिळणाºया ५४ हजार रुपयांसाठी तिथल्या ३० लाखांच्या कामांवर पाणी सोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. नागरिकांचीही गैरसोय झाल्याने अधिकाºयांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी सदर उद्यानात गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी काही मंडळांकडून परवानगी मागितली असता, ती नाकारण्यात आली होती. व्यावसायिक उद्देशाने भरणाºया जत्रेसाठी मात्र उद्यान खुले करून सुविधांची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकारी कसे तयार होतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे तक्रार केली असता, विभाग अधिकारी व परिमंडळ उपआयुक्तांकडून हास्यास्पद खुलासा करण्यात येत आहे.यावरून भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील व मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी स्थानिकांसह पालिका आयुक्तांना धारेवर धरले. उद्यानात जत्रा भरवल्याने यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचे नुकसान झाले आहे.