शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:36 IST

घोषणा केल्याने मदतीची प्रतीक्षा : १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले

योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी घोषित करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. सुमारे वीस दिवसांचा कालावधी उलटला असताना नवी मुंबई शहरातील फेरीवाल्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. याबाबत महापालिकेला देखील काही ठोस सूचना मिळालेल्या नसून शहरातील सुमारे १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोना  झपाट्याने वाढू लागल्याने १३ एप्रिल रोजी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा करण्यात आली होती. याकाळात फेरीवाले, रिक्षा चालक आदींना दिलासा म्हणून राज्यशासन प्रत्येक नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु घोषणा करून सुमारे २० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मदत न मिळाल्याने फेरीवाले नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात साधारण १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून नोंदणी नसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या सुमारे १० हजार इतकी आहे.

मागील वर्षी घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून '' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी '' योजना राबविण्यात आली होती. या योजनेत पथविक्रेत्याला एक वर्षाच्या परतफेड मदतीसह १० हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबई शहरातून सुमारे १५ हजार फेरीवाल्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्यामधील सुमारे चार हजार पथविक्रेत्यांना या योजनेची मदत मिळाली होती. विविध कारणांनी प्रलंबित राहिलेल्या तसेच कालांतराने काही फेरीवाल्यांनी कर्जास नकार दिला. तसेच काहींच्या कर्जाची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मदतीच्या प्रतीक्षेत फेरीवाले आहे. 

नोंदणीकृत फेरीवाल्यांची माहिती महापालिकेकडून शासनाला देण्यात आली आहे. शासनाकडून फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यालयाकडे जमा झाला आहे. निधी त्यांच्याकडून महापालिकेकडे वर्ग केला जाईल तसेच याबाबत गाईडलाईन देखील दिल्या जातील. त्यानंतर फेरीवाल्यांना मदत निधीचे ऑनलाईन पद्धतीने वाटप केले जाणार आहे.- श्रीराम पवार (उपायुक्त, परवाना विभाग, न.मुं.म.पा)

फेरीवाले काय म्हणतात

शासनाकडून फेरीवाल्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयात चौकशी केली होती. परंतु त्यांच्याकडे याबाबत काही माहिती आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.                -गोपाल सिंह (फेरीवाला)-----

संचारबंदीमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. शासनाने दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली होती परंतु मदत अद्याप मिळालेली नाही. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.-महादेव शिंदे (फेरीवाला)

शासनाने जाहीर केलेल्या मदतीमुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु अद्याप प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. मदत कधी मिळणार याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.- संजय देवळे (फेरीवाला)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या