शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वलपमध्ये पाटील दाम्पत्य बनले सदस्य, पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील हा विजय ठरला चर्चेचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:43 IST

तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या.

वैभव गायकर -पनवेल : तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वलप ग्रामपंचायतीमध्ये पाटील दाम्पत्य निवडून आले आहे. एकाच ग्रामपंचायतीमध्ये नवरा-बायको यापुढे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दोघे दाम्पत्य वलप ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोघांनी विजय संपादित केल्याने तालुक्यातील हा विजय चर्चेचा ठरला आहे.तालुक्यात २४ ग्रामपंचायतींपैकी खानावले आणि आकुर्ली ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या झाल्या. या निवडणुकीत वलप ग्रामपंचायत चर्चेत होती. त्या ठिकाणच्या ९ जागांसाठी पाटील आणि खुटारकर असे दोन दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी भोलेनाथ पाटील व जयमाला पाटील हे दाम्पत्य निवडून आले आहे. तर खुटारकर दाम्पत्यात नवनाथ खुटारकर हे विजयी झाले असून संचिता खुटारकर या पराभूत झाल्या आहेत. या लढतीत दोन्ही दाम्पत्यांची थेट लढत नव्हती, मात्र एकाच ग्रामपंचायतीत दोन दाम्पत्य निवडणूक लढत असल्याने हा विषय चर्चेचा ठरला. 

मतदारांनी आम्हाला दिलेल्या कौलाबद्दल आम्ही निश्चितच आनंदी आहोत. ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पती, पत्नी प्रयत्नशील राहू. मतदारांनी आमच्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल आम्ही मतदारांचे आभार व्यक्त करतो.- भोलेनाथ पाटील, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, वलप ग्रामपंचायत

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक