शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पासपोर्टच्या अर्जदारांमध्ये वाढ

By admin | Updated: October 3, 2015 23:32 IST

नवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह

- वैभव गायकर,  पनवेलनवी मुंबईमधील हॉट डेस्टीनेशन म्हणून खारघर ओळखले जाऊ लागले आहे. या ठिकाणचे प्रकल्प, निसर्गाची जोड, सुनियोजित रस्त्यामुळे प्रत्येकाला खारघरमध्ये राहण्याचा मोह आवरता येत नाही. यामुळेच उच्चवर्गीयांचे शहर म्हणून खारघर शहराची ओळख निर्माण होत असताना पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही खारघरमध्ये वाढत आहे. शहराची लोकसंख्या सध्या ३ लाखांच्या घरात आहे. शैक्षणिक केंद्र म्हणून शहर विकसित होत असून देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक खारघरसारख्या शहरामध्ये स्थलांतरित होत आहेत.गतवर्षी आयुक्तालयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, जवळजवळ ४,५०० नागरिकांनी खारघरमधून पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केले होते. येथील गोपनीय विभागांकडे आकडेवारी उपलब्ध आहे. यंदा आतापर्यंत ४,३०० नागरिकांनी पासपोर्टसाठी अर्ज भरले असून वर्षभरात हा आकडा ५००० पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी राहणारे उच्चशिक्षित नागरिक, कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबरच स्वत:ची ओळख व पक्का पत्ता यासाठीही नागरिक पासपोर्ट आवेदन करत असतात. यामधील केवळ १० टक्के पासपोर्टधारकच परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढत असल्याची माहिती उघड झाली आहे. पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये ७० टक्के अमराठी नागरिक आहेत. उच्चवर्गीयाची रहदारी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प यामुळे शहराची ओळख देशात महत्त्वाच्या शहरापैकी एक म्हणून होत आहे. शहरात एकूण ४० सेक्टर असून यापैकी निम्म्या सेक्टरमध्ये नागरिकांची रहदारी वाढलेली नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हणून विकसित होणाऱ्या खारघरमध्ये १५ पेक्षा जास्त विद्यालये व महाविद्यालये असून याठिकाणीही अनेक परप्रांतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या या ठिकाणी लोकसंख्या ३ लाखांच्या घरात असली तरी नजीकच्या काळातच हा आकडा ५ लाखांच्या वर जाणार आहे. तसेच आंतराष्ट्रीय विमानतळ , मेट्रो प्रकल्प यामुळे देखील देशभरातून नागरिक या ठिकाणी स्थायिक होतील. सायन-पनवेल महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यासारखी सहज कनेक्टिव्हिटी असल्यामुळे व्यापारी वर्गाला देखील हे शहर भुरळ घालत आहे