शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या उरण, द्रोणगिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार रेल्वे स्थानकांत पिण्याच्या पाण्यावाचून प्रवाशांची तडफड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 02:00 IST

मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

मधुकर ठाकूर -उरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या उरण -नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चार महिने उलटून गेल्यानंतरही अद्यापही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.यामुळे ऐन उन्हाळ्यात घामाघूम झालेल्या हजारो गरीब- गरजु प्रवाशांवर पिण्याच्या पाण्यावाचून वंचित राहाण्याची पाळी आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  उरण-नेरुळ रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर जानेवारी  २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे.उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.उरण-नेरूळ रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणगिरी, न्हावा -शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी टाक्या ,मोठमोठे कुलर,नळ जोडण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र अद्यापही चारही स्थानकांवर प्रवाशांसाठी पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

आधीच उरणचा उष्म्याचा पाराने ४२ डिग्री पर्यंत चढल्याने प्रवासी पुरते घामाघूम होऊन लागले आहेत.मात्र उरण, द्रोणगिरी, न्हावा शेवा,शेमटीखार या चारही रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने गरीब- गरजु प्रवाशांवर पाण्यावाचून घसा कोरडा पडू लागला आहे.तसेच या चारही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अद्यापही शौचालयाची सोयही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.त्यामुळे सध्या प्रवाशांची पाणी आणि शौचालयाच्या अभावामुळे मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

 चारही स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने सध्या फक्त कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर करण्याची मुभा कर्मचारी काही वेळा प्रवाशांना इमरजन्सी परिस्थितीत करण्यासाठी देतात.मात्र आता  चारही स्थानकांवरील साफसफाईच्या कामाच्या ठेक्याची मुदत संपुष्टात आली आहे.ठेकेदाराला साफसफाईच्या कामाची मुदत अद्यापही वाढवून देण्यात आली नसल्याने मागील दोन दिवसांपासून ठेकेदारांनी साफसफाईची कामे बंद केली आहेत.परिणामी स्थानक परिसर व सध्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शौचालयात साफसफाई अभावी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याच्या संतप्त  प्रतिक्रिया रेल्वे कामगारांकडूनच व्यक्त करण्यात येत आहेत.

 उरण-नेरुळ मार्गावरुन प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आल्यापासून मागील चार महिन्यांपासून प्रवासी संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढच होत चालली आहे.यामुळे रेल्वे गाड्यांची संख्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.तसेच अद्यापही या चारही स्थानकांवर अद्यापही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही सोय करण्यात आलेली नाही.यामुळे गैरकृत्यांना ऊत आला आहे.मध्यरेल्वे प्रशासनाच्या सुरू असलेल्या अशा या ढिसाळ कारभारामुळे प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या गैरसोयींबाबत अधिक माहिती घेऊन कार्यवाहीसाठी संबंधित विभागाला कळवितो असे मध्यरेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी एस.के.जैन यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई