शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात वाहनचालकांकडून पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:29 IST

वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण : कारवाईकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबई : सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा भागातील वर्दळ असणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कडेला होणाºया बेकायदा पार्किंगमुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंगचे फलक बसविण्यात आले आहेत; परंतु वाहनचालकांकडून फलकावरील नियमांचे उल्लंघन होत असून, होणाºया वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियम मोडणाºया वाहनांवर कारवाई करण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नवी मुंबई शहर हे २१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखले जाते. शहराची रचना नियोजनबद्ध झाली असली, तरी वाढत्या नागरीकीकरणामुळे शहरात वाहने पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग होत आहेत. सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा, वाशी भागातील सोसायट्या बाहेरील अरुं द रस्ते. मार्केट, रेल्वे स्थानके, चौक, शाळा-महाविद्यालयांबाहेरील रस्ते आदी ठिकाणच्या रस्त्यांच्याकडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील वाहतूककोंडी होणाºया ठिकाणांचा महापालिका आणि वाहतूक विभागाच्या वतीने सर्व्हे करून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंग आदी सूचनांचे पालिकेच्या माध्यमातून फलक लावण्यात आले आहेत; परंतु या सूचना फलकांना न जुमानता बिनदिक्कतपणे रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर बेकायदा पार्किंग करण्यात येत आहे, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी आणि सोसायट्यांबाहेर वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, पार्किंगच्या नियमांचे फलक लावल्यावर त्या ठिकाणी होणाºया बेकायदा पार्किंगवर कारवाया करून नियंत्रण आणण्याचे वाहतूक पोलिसांकडून अपेक्षित असताना, यावर कारवाया केल्या जात नसल्याने बेकायदा पार्किंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नेरु ळ, सीवूडमधील शाळांच्या बाहेरील रस्त्यावरही बेकायदा पार्किंग होत असल्याने या ठिकाणीही नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत; परंतु परिसरात राहणाºया नागरिकांकडून या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात असल्याने, शाळा भरताना आणि सुटताना विद्यार्थी, पालकांची गर्दी शालेय बस, पालकांची वाहने, इतर वाहने यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. फलक लावलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कारवाया कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.पार्किंगच्या नियमांचे फलक बसविलेल्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती घेण्यात येईल आणि अशा वाहनांवर कारवाया करण्यात येतील. - सुनील लोखंडे, उपायुक्त, वाहतूक पोलीस

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईParkingपार्किंग