शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शहरात पार्किंगची समस्या गंभीर; अंतर्गत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बेकायदा तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 02:50 IST

शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

- अनंत पाटीलनवी मुंबई : शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच येथील वाहनांची संख्याही वाढत आहे; परंतु त्या प्रमाणात वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने शहरात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पार्किंगअभावी वाटेल तेथे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचे नियोजन बिघडले आहे, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.वाहतूककोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातच वाहने पार्क करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. त्याला नागरिकांकडून काही प्रमाणात प्रतिसादही मिळाला होता; परंतु त्यांची बदली होताच पुन्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्त पार्किंग सुरू झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. कोपरी गावालगत पामबीच मार्गावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला चक्क नो पार्किंगमध्ये वाहने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. घणसोली रेल्वेस्थानक, बेलापूर-सीबीडी प्रभात सेंटर, करावे गाव महापालिका तलाव, वाशी सागर विहार चौपाटी, फोर्टीस हॉस्पिटलसमोरील रस्ता, जुहूगाव येथील गावदेवी मैदान, सीवूड रेल्वेस्टेशन, घणसोली आणि तुर्भे महापालिका विभाग कार्यालयाचा परिसर, नेरुळ रेल्वेस्टेशन, तुर्भे येथील जनता मार्केटजवळील उड्डाणपुलाच्या खालील परिसर, शिरवणे गावातील महापालिका शाळेचे मैदान, घणसोली डी-मार्ट परिसर, जुईनगर डी-मार्ट, कोपरखैरणे वैकुंठधाम स्मशानभूमी, तीन टाकी, वाशी गावातील भुयारी मार्गाबाहेर, ऐरोली सेंट झेवियर्स स्कूल, वाशी साईनाथ हायस्कूल, महापालिका प्रथम संदर्भ रु ग्णालय, रबाळे पोलीस स्टेशन परिसर, घणसोली रिलायन्स कंपनी समोरील सर्व्हिस रोड, तसेच कोपरखैरणे बालाजी टॉवर समोरील रस्त्यावरदोन्ही बाजूला बेकायदा पार्किंग दिसून येते.या बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील वाहतूक नियोजन ढासळले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. अनेक ठिकाणी थेट पदपथावर वाहने उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.अनेक विभागांत रस्त्यांच्या कडेला ट्रक, कंटेनर व शाळेच्या बस उभ्या केलेल्या दिसून येतात. त्याकडे संबंधित विभागाचे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.पे अ‍ॅण्ड पार्क : बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली आणि कोपरखैरणे विभागात एकूण १२ ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क आहे, तर बेलापूर ते ऐरोली दरम्यान एकूण५२ वाहनतळ असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी दिली.पार्किंगची प्रमुख समस्या आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येनुसार सिडको आणि महापालिकेने वाहन पार्किंगचे नियोजन करणे गरजेचे आहे. प्रसंगी मल्टिलेवट अर्थात बहुमजली पार्किंग तळाचाही प्रयोग करणे आवश्यक आहे, असे असले तरी वाहनधारकांनी उपलब्ध सुविधांचा वापर करताना नियोजनाला तडा जाणार नाही, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.- नितीन पवार,पोलीस उपायुक्त,वाहतूक शाखा

टॅग्स :Parkingपार्किंग