शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पालकांचे शांतीनिकेतन शाळेविरोधात आंदोलन, फीवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:44 IST

शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.

पनवेल : शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.शांतीनिकेतन शाळेत विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच लायब्ररी, इव्हेंट, अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शाळेचे कपडे व पुस्तके कामोठे व खारघर येथील दुकानातूनच घ्यावे यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कमी किमतीत मिळणारी पुस्तके व कपडे शाळा प्रशासनाकडून नाकारली जात असल्याचे श्याम हंबर्डे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी तक्र ार दाखल केली आहे. मात्र तरी देखील शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी शिक्षणमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अलिबाग आणि पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाने २१ फेब्रुवारी २0१८ रोजी एन.सी.इ.आर.टी. कडून प्रकाशित झालेली अभ्यासक्र माची पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्याबाबत बंधनकारक करून खासगी प्रकाशनाची पुस्तके देण्यात येऊ नयेत, असे कळविले आहे. शाळेमधील पात्र मुख्याध्यापक आणि पात्र शिक्षक यांची नियुक्ती ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये याबाबत सांगण्यात आले आहे. आणि याबाबतची प्रत मा.शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनाही पाठविण्यात आल्याचे पत्र पालकांकडून सादर करण्यात आले असले तरी शांतीनिकेतन शाळेतील शिक्षकांची नियुक्ती चुकीची असल्याचाही आरोप यावेळी पालकांमार्फत करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या जागेत भाड्याने देण्यात आलेल्या अपना बँकेबाबत पालकांनी आवाज उठविताना सांगितले की, शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची योग्य काळजी न घेता आणि शाळा दुरु स्तीच्या नावाखाली पैसे मागत असते.गतवर्षी पालकांची सभा घेऊन ३५ लाख रु पये शाळेला गरज असल्याचे सांगून पालकांवर भर देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केल्यामुळे संतप्त पालकांनी मात्र याबाबत व्यवस्थापनाकडे गेल्या काही वर्षातील हिशोब मागितला असता शाळा व्यवस्थापनाला आर्थिक गळती लागल्याचे समोर आले. त्यामुळे पालकांना अखेर आपल्या पाल्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत.याविषयी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.>खिडक्यांना ग्रील बसवावेशांतीनिकेतन शाळेच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील लावलेले नाहीत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळंबोली येथील सेक्टर ४ मधील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विघ्नेश सतीश साळुंखे ( १२) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून जुलै २0१५ मध्ये उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुर्घटना होण्यापूर्वीच ग्रील बसविण्यात यावेत अशी सूचना पालकांनी केली आहे.