शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

पालकांचे शांतीनिकेतन शाळेविरोधात आंदोलन, फीवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:44 IST

शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.

पनवेल : शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी आकारत असल्यामुळे संतापलेल्या पालकांनी शुक्रवारी आंदोलन केले. फीवाढीचा निषेध करून उपमुख्याध्यापिका मोनाक्षी गुप्ता यांना घेराव घातला.शांतीनिकेतन शाळेत विद्यार्थ्यांकडून अवास्तव फी घेतली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. तसेच लायब्ररी, इव्हेंट, अ‍ॅक्टिव्हिटीच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच शाळेचे कपडे व पुस्तके कामोठे व खारघर येथील दुकानातूनच घ्यावे यासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कमी किमतीत मिळणारी पुस्तके व कपडे शाळा प्रशासनाकडून नाकारली जात असल्याचे श्याम हंबर्डे यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून शांतीनिकेतन शाळा व्यवस्थापनाकडे पालकांनी तक्र ार दाखल केली आहे. मात्र तरी देखील शाळा व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पालकांनी शिक्षणमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अलिबाग आणि पनवेलचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पत्रव्यवहार केला आहे. शिक्षण उपसंचालक नागपूर विभागाने २१ फेब्रुवारी २0१८ रोजी एन.सी.इ.आर.टी. कडून प्रकाशित झालेली अभ्यासक्र माची पुस्तके विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वापरण्याबाबत बंधनकारक करून खासगी प्रकाशनाची पुस्तके देण्यात येऊ नयेत, असे कळविले आहे. शाळेमधील पात्र मुख्याध्यापक आणि पात्र शिक्षक यांची नियुक्ती ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करण्यात येऊ नये याबाबत सांगण्यात आले आहे. आणि याबाबतची प्रत मा.शिक्षण संचालक (महाराष्ट्र राज्य), पुणे यांनाही पाठविण्यात आल्याचे पत्र पालकांकडून सादर करण्यात आले असले तरी शांतीनिकेतन शाळेतील शिक्षकांची नियुक्ती चुकीची असल्याचाही आरोप यावेळी पालकांमार्फत करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या जागेत भाड्याने देण्यात आलेल्या अपना बँकेबाबत पालकांनी आवाज उठविताना सांगितले की, शाळा प्रशासन विद्यार्थ्यांची योग्य काळजी न घेता आणि शाळा दुरु स्तीच्या नावाखाली पैसे मागत असते.गतवर्षी पालकांची सभा घेऊन ३५ लाख रु पये शाळेला गरज असल्याचे सांगून पालकांवर भर देण्याचा प्रयत्न शाळा व्यवस्थापनाने केल्यामुळे संतप्त पालकांनी मात्र याबाबत व्यवस्थापनाकडे गेल्या काही वर्षातील हिशोब मागितला असता शाळा व्यवस्थापनाला आर्थिक गळती लागल्याचे समोर आले. त्यामुळे पालकांना अखेर आपल्या पाल्यांच्या काळजीपोटी आणि त्यांच्या शिक्षणासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत.याविषयी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर सोमवारी योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.>खिडक्यांना ग्रील बसवावेशांतीनिकेतन शाळेच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील लावलेले नाहीत. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कळंबोली येथील सेक्टर ४ मधील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विघ्नेश सतीश साळुंखे ( १२) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून जुलै २0१५ मध्ये उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दुर्घटना होण्यापूर्वीच ग्रील बसविण्यात यावेत अशी सूचना पालकांनी केली आहे.