शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांचे पाणी संकट टळल;देहरंग धरण ओवरफ्लो

By वैभव गायकर | Updated: June 29, 2024 16:07 IST

पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे.

वैभव गायकर

पनवेल: पनवेलकरांचे पाणी संकट टळले आहे.मागील दोन दिवसांपासुन झालेल्या चांगल्या पावसामुळे धारण पूर्णपणे भरले आहे.विशेष म्हणजे धरणाचे पाणी सांडव्यातुन बाहेर जाऊ लागले असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. पनवेल महानगरपालिकेने यावर्षी पाणीपुरवठ्याचे उत्तम नियोजन केले होते.पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी याबाबत सूक्ष्म पाण्याचे नियोजन करीत पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ नये विभाग निहाय आठवड्यात एक दिवस पाणी कपात केली होती.यामुळे पावल्यापर्यंत धरणात पाणीसाठा कायम होता.

माथेरान डोंगराच्या पायथ्याशी पनवेल पालिकेच्या मालकीची 277 हेक्टर जमीन असून त्यापैकी 125 हेक्टरवर देहरंग धरण आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असणारी राज्यातील ही पहिलीच नगरपरिषद म्हणून पनवेलचे नावलौकिक होते.या धरणातून पनवेल शहराला पाणीपुरवठा केला जातो. माथेरानच्या डोंगराची माती वाहून आल्याने धरणाची साठवणूक क्षमता कमी झाली आहे. त्याचा परिमाण शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या ठिकाणाहून पनवेल शहराला उन्हाळा वगळता इतर वेळी प्रति दिन 16 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाण्याची दुप्पट मागणी आहे.याकरिता एमआयडीसी आणि एमजेपी कडून प्रत्येक 16 एमएलडी पाणी पालिका विकत घेते.मे अखेर धरण कोरडे पडल्यानंतर पालिकेला पाण्याकरिता पूर्णत: या दोन विभागांवर अवलंबून राहावे लागते. त्यासाठी वाढीव कोटा घ्यावा लागतो आणि कोट्यवधी रुपये मोजावे लागतात. गेल्या तीन दिवसांपासून देहरंग परिसरात समाधानकारक पाऊस पडला आणि धरणाने सांडवा पातळी गाठली.  देहरंग धरण पूर्णक्षमतेने भरले असल्याने पनवेल शहराचे पाणी संकट टळले आहे.त्यामुळे आठवड्यातून एकदा पाणीकपात बंद केली असुन धरणातून नियमित 16 एमएलडी पाणी घेण्याचे नियोजन केले आहे.- विलास चव्हाण (पाणीपुरवठा अधिकारी,पनवेल महानगरपालिका )