शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पनवेल परिसरात पाणीप्रश्न गंभीर; मागणीपेक्षा कमी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:45 IST

जोपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येत नाही, तोपर्यंत मागणीप्रमाणे पाणी देणे अशक्य असल्याचे एमजेपीने सिडकोला लेखी कळवले आहे. त्यामुळे अगामी काळात पाण्याचा प्रश्न सुटेल, असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झालेले आहे.

कळंबोली : जोपर्यंत जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येत नाही, तोपर्यंत मागणीप्रमाणे पाणी देणे अशक्य असल्याचे एमजेपीने सिडकोला लेखी कळवले आहे. त्यामुळे अगामी काळात पाण्याचा प्रश्न सुटेल, असे चिन्ह दिसत नाही. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करणे क्रमप्राप्त झालेले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची भोकपाडा ते पनवेल या दरम्यानची वाहिनी जुनाट झालेली आहे. अनेक ठिकाणी गळती लागल्याने जवळपास ४० टक्के पाण्याचा अपव्यय होत आहे. वारंवार वाहिनी फुटत असल्याने सातत्याने शटडाउन घेतला जात आहे. यामुळे पनवेल शहरासह नवीन पनवेल, कळंबोली आणि करंजाडे परिसरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला आहे. एमजेपीची वाहिनी बदलण्याचा प्रस्ताव जुनाच आहे. मात्र, निधी आणि इतर तांत्रिक कारणामुळे वाहिन्या बदलण्यात येत नाहीत. मध्यंतरी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे बैठक झाली. त्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर कविता चौतमोल यांनी त्वरित निविदा प्रक्रि या करून कामाला सुरुवात करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार पाणीपुरवठामंत्र्यांनी आदेश दिले आहेत; परंतु या कामाला कमीत कमी तीन वर्षे तरी खर्ची पडणार आहेत. त्या दरम्यान रहिवाशांना पाणी द्यायचे तरी कुठून, असा प्रश्न सिडको आणि महापालिकेला पडला आहे.नवीन पनवेलमध्ये तर रोज तक्र ारींचा पाढा वाचत आहे. आता तर जीवन प्राधिकरणाने सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाला लेखी पत्र दिले आहे. आमची वाहिनी जुनी झाली आहे, त्यामुळे कमीच पाणीपुरवठा केला जाईल, असा त्यामध्ये उल्लेख आहे.एमेजेपीकडून मुळातच कमी पाणी दिले जाते. त्यातून आम्ही नियोजन करतोय, आता तर त्यांनी पत्रसुद्धा दिले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काही पर्यायी व्यवस्था सिडकोकडून करण्यात येत आहेत.- दिलीप बोकाडे,कार्यकारी अभियंता, सिडकोआम्ही सिडकोला पत्र दिले आहे ही वस्तुस्थिती आहे. जीर्ण झालेल्या वाहिन्या वारंवार फुटतात, त्यामुळे जास्त दाबाने पाणीपुरवठा करता येत नाही. नवीन वाहिन्यांकरिता किमान तीन वर्षांचा कालावधीत अपेक्षित आहे.- सुरेंद्र दशोरे,उपअभियंता, एमजेपी

टॅग्स :Waterपाणी