शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाण्याचा अपव्यय टाळण्याचा पनवेल पॅटर्न

By admin | Updated: March 11, 2016 02:55 IST

पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. परंतु नवी मुंबई महापालिका मात्र मलनि:सारण केंद्रातील १८० एमएलडी पाणी ८ वर्षांपासून रोज गटारामध्ये सोडून देत आहे. राज्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. पनवेलमध्येही जवळपास दोन महिन्यापासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जुलैपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. यामुळे शहरातील लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने पाणी परिषद घेवून नागरिकांना वास्तव स्थिती समजावून सांगितली. नागरिकांचे मन वळवून एक दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये राजकीय पक्षांनीही समंजसपणाचे दर्शन घडवून कोणतेही राजकारण केले नाही. नगराध्यक्षा चारूशीला घरत, पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे व सर्वांनीच पिण्याचे पाणी जपून वापरण्यासाठी जनजागृती सुरू केली. उद्यान, बांधकाम व इतर कारणांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जावू नये, असे आवाहन केले. नगरपालिकेने बंदर रोड परिसरात नदीच्या काठावर १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र बांधले आहे. या केंद्रामध्ये प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिकांना ६०० रूपये टँकर व गृहनिर्माण सोसायटीमधील उद्यानांसाठी १०० रूपये टँकर दराने पाणी देण्यास सुरवात केली. ही योजना सुरू केल्यापासून ९ मार्चपर्यंत १०९ टँकरचे वितरण करण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिकांना पाणी पुरविणाऱ्या सर्व ठेकेदारांनाही पत्र पाठवून मलनि:सारण केंद्रातील पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पालिकेचा हा उपक्रम राज्यातील इतर नगरपालिका व महानगरपालिकांसाठी आदर्श ठरला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात अनेक अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. नेरूळ, वाशी व कोपरखैरणे केंद्रांसाठी २०० कोटी रूपये खर्च केला आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात ७ मलनि:सारण केंद्रे आहेत. यामधून रोज १८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. शुद्ध केलेले पाणी विकून महापालिकेला करोडो रूपये मिळतील असे स्वप्न सदर प्रकल्प उभारताना प्रशासनाने दाखविले होते. परंतु २१ जून २००९ ला तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत रोज शुद्ध केलेले पाणी गटारामध्ये सोडून दिले जात आहे. या केंद्रांची देखभाल करण्यासाठी वर्षाला करोडो रूपये खर्च केले जात आहेत. याशिवाय शहरात मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठीही करोडो रूपये खर्च केला आहे. या वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी २०० कोटी रूपये खर्च झाला आहे. एवढा प्रचंड खर्च करून शहरात पाणीटंचाई सुरू असताना पिण्याच्या पाण्याएवढे शुद्ध असलेले प्रक्रियायुक्त पाणी गटारात जात असल्यामुळे दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प २ हजार कोटी रूपयांचा आहे. महापालिकेकडे एकूण सात मलनि:सारण केंद्रे असून त्यांची क्षमता ४४१ एमएलडी क्षमतेची आहे. दुसरीकडे पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प फक्त १५४ कोटी रूपयांचा असून त्यांच्याकडे फक्त १४ एमएलडी क्षमतेचे मलनि:सारण केंद्र आहे. परंतु यानंतरही पनवेल नगरपालिकेने या केंद्रातील पाणी बांधकाम व्यावसायिकांना देण्यास सुरवात केली आहे. दुसरीकडे नवी मुंबई महापालिका मलनि:सारण केंद्रातील पाणी खाडीत सोडत आहे. महापालिकेने पनवेल नगरपालिकेचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. ६०० व १०० रूपयांत टँकरपनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी ६०० रूपये व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी १०० रूपये दराने एक टँकर पाणी देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये पैसे कमविण्याचा उद्देश नसून पिण्याचे पाणी वाचविण्याची भूमिका आहे. परंतु दुसरीकडे महापालिका मात्र शहरवासीयांना पिण्यासाठी पाणी मिळत नसताना बांधकाम, उद्यान व इतर कामांसाठी पिण्याचे पाणी वापरत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांचेही स्वागत पनवेलमधील नागरिकांकडूनही पाणीबचत करण्यात येत आहे. नील सिद्धी, निलेरा गार्डन व गुरूशरण्य या सोसायट्यांमध्ये उद्यानांसाठी मलनि:सारण केंद्रातील शुद्ध केलेले पाणी वापरले जाते. पाणी बचतीच्या मोहिमेला सहकार्य करणाऱ्या सोसायट्यांचे पालिका प्रशासनाने स्वागत केले असून सर्व बांधकामासाठीही प्रक्रिया केलेले पाणी वापर करण्याचे आवाहन केले आहे.