शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पनवेल-पंढरपूर प्रवासी रेल्वे सेवा सुरू व्हावी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 19:53 IST

पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली.

पनवेल -महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायचे दर्शन आणि गळाभेट घेण्यासाठी वैष्णव सदैव व्याकूळ असतात. पनवेल तालुक्यात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणावर असून त्यांना पंढरपूरला जाण्यासाठी सार्वजनिक प्रवासी व्यवस्था व्हावी म्हणून तात्काळ पनवेल-पंढरपूर रेल्वे सेवा सुरू करावी अशी महत्वपूर्ण मागणी पनवेल संघर्ष समितीने रेल्वे मंत्री पियुश गोयल यांना पाठविल्या पत्रातून केली. यासंदर्भात समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी गोयल यांना ट्व्विट  केले आहे.पनवेल तालुका आणि आजुबाजुच्या परिसरातून लाखो वारकरी वर्षभर पंढरीला जात असतात. राज्य परिवहन मंडळाची प्रवासी सेवा अपुरी आणि सोयीस्कर ठरत नसल्याने व्यापक प्रमाणात पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्यवस्था करणे उपयुक्त ठरणार असल्याने वारकरी संप्रदाय, भक्त आणि वैष्णव पंथाची ही फार जुनी मागणी आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री आणि एक मुंबईकर म्हणून आपण महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताच्या भक्तांची हाक ऐकाल, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली आहे. सध्या वारीचे दिवस सुरू झाले आहेत. वर्षानुवर्ष वारी करणारे काही वैष्णव वयोपरत्वे वयोवृध्द झाले आहेत. त्यांचे शरीर थकले असले तरी एकदा डोळे भरून विठूरायाला पाहण्याची आस त्यांना लागून राहिलेली आहे. ही त्यांची मनाची वारी पूर्ण करण्यासाठी पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा अतिशय महत्वाची ठरणार आहे. पनवेल रेल्वे स्टेशनहून दररोज किमान एक हजार भक्त पंधरपूरला निश्चित रेल्वेने जाऊ शकतील. त्याशिवाय वर्षभर या प्रवासी सेवेला उत्तम प्रतिसाद लाभेल, असा विश्वासही गोयल यांना देवून ही सेवा लोकार्पण करण्याची संधी साधावी, अशी विनंती समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने कांतीलाल कडू यांनी केली आहे. वारीचे दिवस भारलेले असतात. सगळीकडून दिंड्या पंढरीच्या दिशेने कुच करतात. आरोग्य अथवा इतर काही कारणांनी वारीसेवा न करणाऱ्या वैष्णवांच्या मनाला त्यामुळे आघात पोहचतो. मनाला ते सल्य बोचत असते. त्यांच्या मन:स्थितीतीचा विचार करून त्यांना विठूरायाचा चरणस्पर्श व्हावा, वैकुंठरायाच्या मंदिराचे कळस दॄष्टीस पडावे, वैष्णवांची बहीण असलेल्या चंद्रभागेत स्नान करता यावे, ही माफक अपेक्षा ठेवून ते पंढरीच्या वाटेवर डोळे लावून असतात. त्यामुळे या रेल्वे सेवेचा विचार करणे उचित ठरेल, असा दावा कडू यांनी केला आहे.याशिवाय सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अजमेर येथील शरिफ गरीब नवाज़ बाबा दर्ग्यास भेट देण्यास अथवा आशीर्वाद घेण्यासाठी नागरिक पनवेलहून सतत मिळेल त्या वाहनांतून जात आहेत. त्यांचा सुखरूप आणि सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून पनवेल ते अजमेर रेल्वे सेवेसाठी त्या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करून सहकार्य करावे, अशी संयुक्तपणे मागणी कांतीलाल कडू यांनी केली आहे.पनवेल ते पंढरपूर आणि पनवेल ते अजमेर ही महाराष्ट्राच्या जनतेची दोन्ही श्रध्दास्थाने आहेत. अध्यात्मिक विभूती किंवा प्रचिती देणारी पवित्र स्थाने असल्याने रेल्वे मंत्री या नात्याने पनवेलच्या एकात्मिकतेची श्रध्दा अखंडित रहावी यांकरीता दोन्ही मार्गावर पनवेलपासून सार्वजनिक प्रवासी सेवा सुरू करावी अशी कळकळीची मागणी कडू यांनी केली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेpanvelपनवेलPandharpurपंढरपूर