शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल पालिकेचा मॉल बंदचा निर्णय, कामगारांचा रोजगार धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 02:01 IST

नागरिकांमध्ये नाराजी : प्रशासनाच्या धोरणाचा पडला प्रश्न, कामगारांचा रोजगार धोक्यात

पनवेल : राज्य शासनाने मिशन बिगिन अगेन म्हणत विविध प्रकारच्या बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिकांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मुंबई, नवी मुंबई महापालिकेने शहरातील मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु पनवेल महानगरपालिकेने मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पनवेलमध्ये मिशन बिगिन अगेन कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करीत, विविध आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. मात्र, कोरोनासोबत लढताना परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली. महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार शासनाने दिल्यानंतर, मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकेने मॉल्स सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. याच धर्तीवर पनवेल महानगरपालिकाही मॉल्स सुरू करून नागरिकांना एक प्रकारे दिलासा देईल, अशी नागरिकांची भावना झाली होती. मात्र, पनवेलमधील मॉल्स बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने नागरिकांमध्ये एक प्रकारे नाराजी पसरली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घेतली जाणारी खबरदारी, तसेच उपाययोजना या संदर्भात प्रत्येक जण योग्य ती काळजी घेत असतो. भविष्यात कोरोनासोबत जगायचे असल्याने, सर्व गोष्टीची खबरदारी घेऊनच मॉल्स, तसेच इतर दुकाने सुरू ठेवण्याची आवश्यकता असल्याचे पनवेलमधील नागरिक विशाल सिनारे यांचे म्हणणे आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मॉल्स सुरू होत असताना पनवेलमध्ये बंद ठेवण्यामागे प्रशासनाचे काय धोरण आहे?सध्याच्या घडीला शहरातील इतर बाजारपेठा, व्यापारी मंडई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग योग्य पद्धतीने पाळले जात नाही. त्या तुलनेत मॉल्समध्ये सर्व खबरदारी घेतली जात असेल, तर नागरिकांच्या दृष्टीने सोईस्कर, तसेच सुरक्षित आहे. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊननंतर रोजगाराचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. पनवेलमधील ओरियन मॉलमध्येही तब्बल १,२०० कामगार विविध विभागांत कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या साडेचार महिन्यांपासून सर्वांचाच रोजगार थांबला असल्याने, हे कामगारही हवालदिल झाले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल