शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

पेंधर उड्डाणपुलाचा अडथळा दूर; भूधारकाला मोबदला देण्याची सिडकोची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:12 IST

खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली.

- वैभव गायकरपनवेल : खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. परंतु सिडकोने नमते घेतल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खारघर ते तळोजा शहराला जोडणाºया पुलाचे काम सुरू असलेली जागा असंपादित आहे. संबंधित जागेच्या मालकाची परवानगी न घेता सिडकोने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. पेंधर गावातील शेतकरी जहूर पटेल यांची या परिसरात सुमारे ४५ गुंठे जागा आहे. ही जागा संपादनातून वगळण्यात आल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या २00७ च्या राजपत्रात आहे. असे असतानाही सिडकोने २0१२ मध्ये या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू केले. या कामाला सदर शेतकºयाने विरोध केला. त्यामुळे हे काम थांबले. दरम्यान, ही जागा प्रकल्पासाठी द्यावी, यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू झाले. त्याबदल्यात या शेतकºयाला २२.५ टक्केचे पॅकेज देण्याचेही सिडकोकडून आमिष दाखविण्यात आले. परंतु शेतकरी जहूर पटेल यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. आपली एकूण जागा ४५ गुंठे इतकी असताना २२.५ टक्के भूखंड का म्हणून घ्यायचा असा पवित्रा पटेल यांनी घेतला. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर उड्डाणपुलाची गरज लक्षात घेवून सिडकोने या प्रकरणात काहीशी सामंजस्याची भूमिका घेत पटेल यांच्या ४५ गुंठे जागेच्या बदल्यात तितकीच जागा अन्य ठिकाणी देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे या जागेवर असलेले हॉटेलचे बांधकाम हटविण्यासाठी सिडकोने शेतकºयाला ७२ लाख रुपयेसुध्दा दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. खारघर शहर व तळोजा फेज २ ला जोडणाºया पुलामुळे दोन्ही शहरामधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी नुकताच सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.मुंब्रा-पनवेल महामार्गावर अवजड वाहनांची ये-जा असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील रखडल्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात. तसेच तळोजा फेज -२ मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे नोकरदारवर्गाला या नव्या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तळोजामध्ये वाहतूककोंडीची समस्या जटील आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर खारघर शहरामधील सर्व वाहतूक नव्या खारघर - तळोजा मार्गावर वळणार आहे. सध्या मागील सहा वर्षांपासून रखडलेले हे काम शीघ्र गतीने मार्गी लावण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे. सिडकोने तातडीने हे काम पूर्ण करावे, जेणेकरून खारघर शहरातून तळोजा (पेंधर) कडे जाणाºया रहिवाशांचा मार्ग सुकर होईल, अशी प्रतिक्रिया तळोजा येथील नगरसेवक अजीज पटेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शेतकºयाच्या लढ्याला यशखासगी जागा असताना देखील सिडकोने या जागेवर उड्डाणपूल उभारताना शेतकºयाला विश्वासात घेतले नव्हते. २0१५ मध्ये सिडकोने या जागेसंबंधी बैठकीकरिता बोलावले होते. संबंधित जागेचा २२.५ टक्के मोबदला देण्याचे आमिष शेतकºयाला दिले होते. परंतु १00 टक्के जागा हवी, अशी भूमिका शेतकºयाने घेतली. अखेर एप्रिल २0१८ मध्ये सिडकोने नमती भूमिका घेत शेतकºयाच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे बहुद्देशीय उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :panvelपनवेल