शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

पेंधर उड्डाणपुलाचा अडथळा दूर; भूधारकाला मोबदला देण्याची सिडकोची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:12 IST

खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली.

- वैभव गायकरपनवेल : खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. परंतु सिडकोने नमते घेतल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खारघर ते तळोजा शहराला जोडणाºया पुलाचे काम सुरू असलेली जागा असंपादित आहे. संबंधित जागेच्या मालकाची परवानगी न घेता सिडकोने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. पेंधर गावातील शेतकरी जहूर पटेल यांची या परिसरात सुमारे ४५ गुंठे जागा आहे. ही जागा संपादनातून वगळण्यात आल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या २00७ च्या राजपत्रात आहे. असे असतानाही सिडकोने २0१२ मध्ये या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू केले. या कामाला सदर शेतकºयाने विरोध केला. त्यामुळे हे काम थांबले. दरम्यान, ही जागा प्रकल्पासाठी द्यावी, यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू झाले. त्याबदल्यात या शेतकºयाला २२.५ टक्केचे पॅकेज देण्याचेही सिडकोकडून आमिष दाखविण्यात आले. परंतु शेतकरी जहूर पटेल यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. आपली एकूण जागा ४५ गुंठे इतकी असताना २२.५ टक्के भूखंड का म्हणून घ्यायचा असा पवित्रा पटेल यांनी घेतला. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर उड्डाणपुलाची गरज लक्षात घेवून सिडकोने या प्रकरणात काहीशी सामंजस्याची भूमिका घेत पटेल यांच्या ४५ गुंठे जागेच्या बदल्यात तितकीच जागा अन्य ठिकाणी देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे या जागेवर असलेले हॉटेलचे बांधकाम हटविण्यासाठी सिडकोने शेतकºयाला ७२ लाख रुपयेसुध्दा दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. खारघर शहर व तळोजा फेज २ ला जोडणाºया पुलामुळे दोन्ही शहरामधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी नुकताच सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.मुंब्रा-पनवेल महामार्गावर अवजड वाहनांची ये-जा असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील रखडल्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात. तसेच तळोजा फेज -२ मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे नोकरदारवर्गाला या नव्या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तळोजामध्ये वाहतूककोंडीची समस्या जटील आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर खारघर शहरामधील सर्व वाहतूक नव्या खारघर - तळोजा मार्गावर वळणार आहे. सध्या मागील सहा वर्षांपासून रखडलेले हे काम शीघ्र गतीने मार्गी लावण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे. सिडकोने तातडीने हे काम पूर्ण करावे, जेणेकरून खारघर शहरातून तळोजा (पेंधर) कडे जाणाºया रहिवाशांचा मार्ग सुकर होईल, अशी प्रतिक्रिया तळोजा येथील नगरसेवक अजीज पटेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शेतकºयाच्या लढ्याला यशखासगी जागा असताना देखील सिडकोने या जागेवर उड्डाणपूल उभारताना शेतकºयाला विश्वासात घेतले नव्हते. २0१५ मध्ये सिडकोने या जागेसंबंधी बैठकीकरिता बोलावले होते. संबंधित जागेचा २२.५ टक्के मोबदला देण्याचे आमिष शेतकºयाला दिले होते. परंतु १00 टक्के जागा हवी, अशी भूमिका शेतकºयाने घेतली. अखेर एप्रिल २0१८ मध्ये सिडकोने नमती भूमिका घेत शेतकºयाच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे बहुद्देशीय उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :panvelपनवेल