शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

पेंधर उड्डाणपुलाचा अडथळा दूर; भूधारकाला मोबदला देण्याची सिडकोची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:12 IST

खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली.

- वैभव गायकरपनवेल : खारघर-तळोजा (फेज २) या दरम्यान पेंधर येथे मुंब्रा-पनवेल महामार्गावर उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा तिढा सुटला आहे. सिडको आणि स्थानिक शेतकऱ्याच्या वादामुळे या उड्डाणपुलाची रखडपट्टी झाली. परंतु सिडकोने नमते घेतल्याने लवकरच या पुलाच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.खारघर ते तळोजा शहराला जोडणाºया पुलाचे काम सुरू असलेली जागा असंपादित आहे. संबंधित जागेच्या मालकाची परवानगी न घेता सिडकोने येथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. पेंधर गावातील शेतकरी जहूर पटेल यांची या परिसरात सुमारे ४५ गुंठे जागा आहे. ही जागा संपादनातून वगळण्यात आल्याचा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या २00७ च्या राजपत्रात आहे. असे असतानाही सिडकोने २0१२ मध्ये या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू केले. या कामाला सदर शेतकºयाने विरोध केला. त्यामुळे हे काम थांबले. दरम्यान, ही जागा प्रकल्पासाठी द्यावी, यासाठी सिडकोकडून प्रयत्न सुरू झाले. त्याबदल्यात या शेतकºयाला २२.५ टक्केचे पॅकेज देण्याचेही सिडकोकडून आमिष दाखविण्यात आले. परंतु शेतकरी जहूर पटेल यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. आपली एकूण जागा ४५ गुंठे इतकी असताना २२.५ टक्के भूखंड का म्हणून घ्यायचा असा पवित्रा पटेल यांनी घेतला. त्यामुळे सिडकोसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर उड्डाणपुलाची गरज लक्षात घेवून सिडकोने या प्रकरणात काहीशी सामंजस्याची भूमिका घेत पटेल यांच्या ४५ गुंठे जागेच्या बदल्यात तितकीच जागा अन्य ठिकाणी देण्याचे मान्य केले आहे. विशेष म्हणजे या जागेवर असलेले हॉटेलचे बांधकाम हटविण्यासाठी सिडकोने शेतकºयाला ७२ लाख रुपयेसुध्दा दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या उड्डाणपुलाच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे. खारघर शहर व तळोजा फेज २ ला जोडणाºया पुलामुळे दोन्ही शहरामधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी नुकताच सिडकोशी पत्रव्यवहार केला आहे.मुंब्रा-पनवेल महामार्गावर अवजड वाहनांची ये-जा असते. या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील रखडल्यामुळे या मार्गावर अपघात होत असतात. तसेच तळोजा फेज -२ मध्ये औद्योगिक वसाहत असल्यामुळे नोकरदारवर्गाला या नव्या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तळोजामध्ये वाहतूककोंडीची समस्या जटील आहे. हा उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर खारघर शहरामधील सर्व वाहतूक नव्या खारघर - तळोजा मार्गावर वळणार आहे. सध्या मागील सहा वर्षांपासून रखडलेले हे काम शीघ्र गतीने मार्गी लावण्याचे आव्हान सिडकोसमोर आहे. सिडकोने तातडीने हे काम पूर्ण करावे, जेणेकरून खारघर शहरातून तळोजा (पेंधर) कडे जाणाºया रहिवाशांचा मार्ग सुकर होईल, अशी प्रतिक्रिया तळोजा येथील नगरसेवक अजीज पटेल यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, यासंदर्भात सिडकोचे जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.शेतकºयाच्या लढ्याला यशखासगी जागा असताना देखील सिडकोने या जागेवर उड्डाणपूल उभारताना शेतकºयाला विश्वासात घेतले नव्हते. २0१५ मध्ये सिडकोने या जागेसंबंधी बैठकीकरिता बोलावले होते. संबंधित जागेचा २२.५ टक्के मोबदला देण्याचे आमिष शेतकºयाला दिले होते. परंतु १00 टक्के जागा हवी, अशी भूमिका शेतकºयाने घेतली. अखेर एप्रिल २0१८ मध्ये सिडकोने नमती भूमिका घेत शेतकºयाच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे बहुद्देशीय उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :panvelपनवेल