शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अवकाळी पावसामुळे पनवेल तालुक्यातील २०० हेक्टरवरील भातपीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:40 IST

पंचनाम्यांना सुरुवात : हातचे पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल; लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

मयुर तांबडे

पनवेल : तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे.आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती तहसीलदार सानप यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे.शेतकºयाला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.पनवेल तालुक्यात एकूण ८हजार १५० हेक्टर शेतीचे पीक घेतले जाते. यापैकी पावसामुळे काहीशेती पाण्यात गेली आहे. शेतातपाणी साचल्याने पिक कुजलेआहे. काही ठिकाणी भातालाकोंब फुटले आहेत. जुलै २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक हजार दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे शासनाला जमा करण्यात आलेले आहेत.आॅक्टोबरमध्ये जवळपास २०० हेक्टर भातपिकाचे नुकसान झालेले आहे. तालुक्यातील ७ शेतकरयानी पीक विमा उतरवला होता. त्यांनी पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस