शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

बारावीचा निकाल ८९ टक्के, शहरात यंदाही मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 23:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. शहरात बारावीचा ८९.१३ टक्के निकाल लागला आहे. तर सुमारे ३ महाविद्यालयांच्या सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जल्लोष साजरा केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र प्रात्यक्षिक परीक्षा १ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २0१९ व २१ फेब्रुवारी ते २0 मार्च या कालावधीमध्ये लेखी परीक्षा घेण्यात आली होती.परीक्षेसाठी नवी मुंबई शहरातील तिन्ही शाखेच्या ६0 हून अधिक महाविद्यालयांमधून १४,८७९ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामधून १४,८७३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ६९४ पुनर्परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. यामधून १२,८६२ नियमित परीक्षार्थी पास झाले असून १८८ पुनर्परीक्षार्थी पास झाले आहेत.नवी मुंबई शहरातील फादर अँगल महाविद्यालय वाशी, नेरु ळमधील सेंट झेवियर्स हायस्कूल आणि महाविद्यालय, सीवूडमधील सिक्रेट हार्ट स्कूल आणि महाविद्यालय या महाविद्यालयांमधील सर्वच शाखांचा निकाल १00 टक्के लागला आहे. कोपरखैरणेमधील रा.फ. महाविद्यालयाच्या सायन्स शाखेचा, कोपरखैरणे येथील ख्रिस्ट अ‍ॅकॅडमी, सेंट मेरी महाविद्यालय, सीबीडी येथील भारती विद्यापीठ महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेचा निकाल १00 टक्के लागला आहे. तसेच नेरुळमधील एमजीएम ओकेशनल महाविद्यालयाचा निकाल देखील १00 टक्के लागला आहे.निकालाचा दिवस असल्याने विद्यार्थी आणि पालकांना सकाळपासूनच उत्सुकता लागली होती. दुपारी आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी पालकांसह शाळा गाठून शिक्षकांसमवेत जल्लोष साजरा केला.अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा अभ्यास करावा, आयुष्यात खूप मोठ्या संधी आहेत.गुण पडताळणीसाठी अर्ज करण्याची तारीख ७ जूनपर्यंत असून उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांनी १७ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.>पनवेलमध्ये टक्का वाढलाआॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर पनवेल शहरातील सायबर कॅफे त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आवारात मोबाइलवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दीकेली होती.पनवेल तालुक्यातील व्ही. के. हायस्कूल विज्ञान शाखेचा ९२.५४ टक्के, कला शाखेचा ७५.५४ टक्के तर वाणिज्य शाखेचा ९१.८४ टक्के निकाल लागला आहे. त्याचबरोबर चांगू काना ठाकूर विज्ञान शाखेचा ९७.६५ टक्के, कला शाखा ९६.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा ९६.३९ टक्के निकाल लागला आहे. बांठिया माध्यमिक विद्यालय विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला असून कला शाखा ८६.५९ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५ टक्के निकाल लागला आहे. सुषमा पाटील महाविद्यालय कामोठे विज्ञान शाखेचा १०० टक्के तर कला शाखा ६० टक्के, वाणिज्य ९७.०५ टक्के, के. एल. ई. कॉलेज कळंबोली विज्ञान शाखेत ९१.६१ टक्के, वाणिज्य ९८.७१ टक्के निकालाची नोंद झाली आहे.>कोकण विभागाचा निकाल ९३.२३%विभागवार निकालामध्ये कोकण विभागाचा निकाल ९३.२३ टक्के लागून आहे. रायगड जिल्ह्याचा निकाल ८४.९७ टक्के लागला असून सर्व शाखांच्या एकूण ३०,८३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. त्यापैकी ३०,८०१ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी विशेष गुणवत्ता श्रेणीत १२६०, प्रथम श्रेणीत ६१७२, द्वितीय श्रेणीत १६,५५३ तर उत्तीर्ण श्रेणीत २१८८ असे ८४.९७ टक्के म्हणजे एकूण २६,१७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७७.३२ टक्के मुले तर ८९.९९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.