शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 21:12 IST

१०० हेक्टर जमीन अद्यापही बंदराकडेच: पर्यावरणवाद्याचा दाव्याने पोलखोल!

 मधुकर ठाकूर 

उरण : देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाणा-या जेएनपीएने वनखात्याला आपल्या अखत्यारीतील ८१४.३५ हेक्टर कांदळवने संरक्षण आणि संवर्धनासाठी सुपूर्द केली असली तरी हा आकडा अपूर्ण आहे.आणखी १०० हेक्टर कांदळवन क्षेत्र अद्यापही जेएनपीएने सुपुर्द केला नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी आदेशाद्वारे कांदळवनांचे संरक्षण व जतन वन विभागाद्वारे होणे आवश्यक असल्याचे बीइएजीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर स्पष्ट केले होते.मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया कुर्मगतीने सुरु होती. सिडको, एमएमआरडीए आणि अगदी जेएनपीएसारख्या शासकीय संस्थाही वन विभागाला कांदळवनांचे हस्तांतरण करण्यात दिरंगाई करीत असल्याची बाब नॅट कनेक्ट फाऊंडेशनने निदर्शनास आणली होती.  

त्यानंतर जेएनपीएने कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानंतर चार दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ८१४ हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र महाराष्ट्र सरकारच्या मॅंग्रोव्ह सेल यांना सुपूर्द केले आहे.मात्र जेएनपीएने ९१४ हेक्टर क्षेत्रापैकी ८१४ हेक्टर कांदळवन क्षेत्रच हस्तांतरित केले आहे.१०० हेक्टर क्षेत्र अद्यापही जेएनपीएकडे असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला आहे. 

यापूर्वी आपल्या क्षेत्रातील कांदळवनांचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचा दावा करणा-या जेएनपीए बंदराने नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या आरटीआय प्रतिसादामध्ये ९१४ हेक्टर खारफुटी त्याच्या हद्दीत असल्याचे मान्य केले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले होते.जेएनपीएने आपल्या अधिकारातल्या सर्व कांदळवनांचे क्षेत्र सुपूर्द करायला  हवे. किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षक, “कार्बन सिंक्स” आणि विविध प्रकारचे मासे व खेकड्यांच्या पैदाशीची जागा असलेल्या या क्षेत्रातल्या आणखीन जागेची आवश्यकता भासल्यास मात्र यापुढे कांदळवन क्षेत्रातील जागेचा वापर करण्यासाठी जेएनपीएला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असे कुमार म्हणाले.

राज्य शासन आणि न्यायालय नियुक्त कांदळवन संरक्षण आणि जतन समितीने  विविध एजन्सी व कलेक्टर्सना वन विभागाला समुद्री वनांचे हस्तांतरण केले गेल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र अजुनही शासकीय एजन्सी आपल्याला हवा तेवढा वेळ घेत असल्याचे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांचा आरोप आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई