शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 21:12 IST

१०० हेक्टर जमीन अद्यापही बंदराकडेच: पर्यावरणवाद्याचा दाव्याने पोलखोल!

 मधुकर ठाकूर 

उरण : देशातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट म्हणून ओळखले जाणा-या जेएनपीएने वनखात्याला आपल्या अखत्यारीतील ८१४.३५ हेक्टर कांदळवने संरक्षण आणि संवर्धनासाठी सुपूर्द केली असली तरी हा आकडा अपूर्ण आहे.आणखी १०० हेक्टर कांदळवन क्षेत्र अद्यापही जेएनपीएने सुपुर्द केला नसल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी आदेशाद्वारे कांदळवनांचे संरक्षण व जतन वन विभागाद्वारे होणे आवश्यक असल्याचे बीइएजीने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर स्पष्ट केले होते.मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया कुर्मगतीने सुरु होती. सिडको, एमएमआरडीए आणि अगदी जेएनपीएसारख्या शासकीय संस्थाही वन विभागाला कांदळवनांचे हस्तांतरण करण्यात दिरंगाई करीत असल्याची बाब नॅट कनेक्ट फाऊंडेशनने निदर्शनास आणली होती.  

त्यानंतर जेएनपीएने कांदळवन क्षेत्राची हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.त्यानंतर चार दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी ८१४ हेक्टर मॅन्ग्रोव्ह क्षेत्र महाराष्ट्र सरकारच्या मॅंग्रोव्ह सेल यांना सुपूर्द केले आहे.मात्र जेएनपीएने ९१४ हेक्टर क्षेत्रापैकी ८१४ हेक्टर कांदळवन क्षेत्रच हस्तांतरित केले आहे.१०० हेक्टर क्षेत्र अद्यापही जेएनपीएकडे असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून केला आहे. 

यापूर्वी आपल्या क्षेत्रातील कांदळवनांचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचा दावा करणा-या जेएनपीए बंदराने नॅटकनेक्ट फाउंडेशनच्या आरटीआय प्रतिसादामध्ये ९१४ हेक्टर खारफुटी त्याच्या हद्दीत असल्याचे मान्य केले असल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणून दिले होते.जेएनपीएने आपल्या अधिकारातल्या सर्व कांदळवनांचे क्षेत्र सुपूर्द करायला  हवे. किनारपट्टीचे नैसर्गिक संरक्षक, “कार्बन सिंक्स” आणि विविध प्रकारचे मासे व खेकड्यांच्या पैदाशीची जागा असलेल्या या क्षेत्रातल्या आणखीन जागेची आवश्यकता भासल्यास मात्र यापुढे कांदळवन क्षेत्रातील जागेचा वापर करण्यासाठी जेएनपीएला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असे कुमार म्हणाले.

राज्य शासन आणि न्यायालय नियुक्त कांदळवन संरक्षण आणि जतन समितीने  विविध एजन्सी व कलेक्टर्सना वन विभागाला समुद्री वनांचे हस्तांतरण केले गेल्याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र अजुनही शासकीय एजन्सी आपल्याला हवा तेवढा वेळ घेत असल्याचे श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांचा आरोप आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई