शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी बंदराची खोली वाढवण्यास विरोध

By admin | Updated: January 24, 2017 05:56 IST

जेएनपीटी बंदर अंतर्गत मुंबई हार्बर आणि जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण

उरण : जेएनपीटी बंदर अंतर्गत मुंबई हार्बर आणि जेएनपीटी बंदराच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोमवारी बैठक बोलावली होती. ही बैठक संतप्त प्रकल्पग्रस्तांनी उधळून लावली. अप्पर जिल्हाधिकारी किरण पाणगुडे यांच्या उपस्थितीत बैठकीत जनसुनावणी होणार होती. मात्र संतप्त सरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि मच्छिमारांपुढे अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली.जनसामान्यांच्या समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या कामाला ग्रामस्थांनीतीव्र विरोध केल्याने वरिष्ठांमार्फत अहवाल सरकारला तातडीने सादर करण्याचे आश्वासन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरच ग्रामस्थांचा राग शांत झाला.जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराच्या विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड मातीचे भराव केले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढतच चालली आहे. पंधरा मीटर्सपर्यंत समुद्र चॅनेलची खोली वाढविण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे आणि भरावाच्या कामामुळे समुद्राचे पाणी सागरी किनाऱ्यांचे उल्लंघन आणि किनाऱ्यावरील बांध बंधिस्ती संरक्षक तट उध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने सरकू लागले आहे. जेएनपीटीच्या कामामुळे पर्यावरणाची होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जेएनपीटी कामगार वसाहतीमधील बहुउद्देशीय सभागृहात जनसुनावणी घेण्यात आली. रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जनसुनावणीसाठी ए. डी. मोहेकर, उनप मुख्याधिकारी संदीप खोमणी आदी अधिकाऱ्यांबरोबरच विविध ग्रा. पं.चे सरपंच सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महिला रणरागिणीही सहभागी झाल्या होत्या. जनसुनावणीच्या प्रारंभापासूनच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जेएनपीटी आणि उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला. जेएनपीटी बंदरात होणारा दगड मातीचा भराव, समुद्री चॅनेलची खोली वाढविण्यासाठी केले जाणारे ब्लास्टिंक, समुद्रात सोडण्यात येणारे काळे तेल, वाढत्या प्रदूषणामुळे पारंपारिक मच्छिमारांवर आलेली उपासमारीची पाळी आणि सातत्याने होणाऱ्या भरावामुळे किनारपट्टीवरील गावागावात शिरणारे समुद्राचे पाणी याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल, जेएनपीटी बंदर अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बैठक उधळून लावली. ग्रामस्थांचे प्रश्न निकाली निघाल्याशिवाय प्रकल्पच होवू देणार नसल्याचा कडक इशाराही संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी यावेळी दिला. (वार्ताहर)