शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधील बैठकांचे प्रमाण वाढले आहे. पक्षांचे नेते व उमेदवार बैठकांना उपस्थित राहून नागरिकांना गावच्या विकासाचे साकडे घालत आहेत.मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. सातारा, पुणे, हातकणंगले, माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. सातारा व माढा मतदार संघामधील अनेक गावांमधील ७० ते ८० टक्के नागरिक वास्तव्यासाठी मुंबई, नवी मुंबईमध्ये आहेत. अनेकांची दोन्ही ठिकाणी मतदार संघामध्ये नावे आहेत. यामुळे ग्रामीण भागामधील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शिरुर मतदार संघामधील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. याशिवाय माढा मतदार संघामधील कार्यकर्त्यांचा व माथाडी कामगारांचा मेळावा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्येही माथाडी कामगारांना गावाकडे चलाचे आवाहन करण्यात आले होते. सातारा - जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक महिन्यामध्ये दोन वेळा नवी मुंबईमध्ये हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सातारा व पुणे जिल्ह्यामधील चाकरमान्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी मुंबई व गावाकडील मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यामुळे सर्वप्रथम गावी येवून मतदानामध्ये सहभाग घ्यावा. गावच्या विकासामध्ये सर्वांचे योगदान हवे, असे भावनात्मक आवाहन केले जात आहे.यापूर्वी गावाकडील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गावचे राजकारण चालत होते, परंतु मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या नागरिकांनी आर्थिक प्रगती केल्याने गावच्या राजकारणामध्ये चाकरमान्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माथाडी कामगारांनी गावी जाऊन निकाल बदलला होता. तेव्हापासून ग्रामीण नेत्यांनी मुंबईमधील चाकरमान्यांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली. मुंंबईकरांचे मत वळविले की पूर्ण गावचे मत वळते असे समीकरण अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांना गावी घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारीही दाखविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व भाजपाने चाकरमान्यांची मते मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ही मते नक्की कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरुरमध्ये लागणार कसोटीसातारा, माढा, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, शिरुर, बारामती मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदार संघामधील नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्यांची संख्या जास्त आहे. गावाकडील व मुंबई, नवी मुंबईमधील मतदानाची तारीख वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. फक्त शिरुर व मुंबई, नवी मुंबईमधील मतदान एकाच दिवशी असल्यामुळे त्या मतदार संघातील उमेदवारांची मतदार गावी घेऊन जाण्यासाठी कसोटी लागणार आहे.माथाडी मेळाव्याकडेही लक्ष२३ मार्चला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये माथाडी मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचारास आरंभ केला जात होता. यावर्षी माथाडी संघटना भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये विभागली आहे. यामुळे माथाडी मेळाव्यामध्ये नक्की कोणती भूमिका घेतली जाणार याविषयी उत्सुकता असून कामगार माथाडी नेत्यांचे ऐकणार की स्वत:ची भूमिका स्वत: ठरविणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान