शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 05:29 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधील बैठकांचे प्रमाण वाढले आहे. पक्षांचे नेते व उमेदवार बैठकांना उपस्थित राहून नागरिकांना गावच्या विकासाचे साकडे घालत आहेत.मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. सातारा, पुणे, हातकणंगले, माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. सातारा व माढा मतदार संघामधील अनेक गावांमधील ७० ते ८० टक्के नागरिक वास्तव्यासाठी मुंबई, नवी मुंबईमध्ये आहेत. अनेकांची दोन्ही ठिकाणी मतदार संघामध्ये नावे आहेत. यामुळे ग्रामीण भागामधील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शिरुर मतदार संघामधील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. याशिवाय माढा मतदार संघामधील कार्यकर्त्यांचा व माथाडी कामगारांचा मेळावा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्येही माथाडी कामगारांना गावाकडे चलाचे आवाहन करण्यात आले होते. सातारा - जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक महिन्यामध्ये दोन वेळा नवी मुंबईमध्ये हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सातारा व पुणे जिल्ह्यामधील चाकरमान्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी मुंबई व गावाकडील मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यामुळे सर्वप्रथम गावी येवून मतदानामध्ये सहभाग घ्यावा. गावच्या विकासामध्ये सर्वांचे योगदान हवे, असे भावनात्मक आवाहन केले जात आहे.यापूर्वी गावाकडील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गावचे राजकारण चालत होते, परंतु मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या नागरिकांनी आर्थिक प्रगती केल्याने गावच्या राजकारणामध्ये चाकरमान्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माथाडी कामगारांनी गावी जाऊन निकाल बदलला होता. तेव्हापासून ग्रामीण नेत्यांनी मुंबईमधील चाकरमान्यांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली. मुंंबईकरांचे मत वळविले की पूर्ण गावचे मत वळते असे समीकरण अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांना गावी घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारीही दाखविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व भाजपाने चाकरमान्यांची मते मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ही मते नक्की कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरुरमध्ये लागणार कसोटीसातारा, माढा, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, शिरुर, बारामती मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदार संघामधील नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्यांची संख्या जास्त आहे. गावाकडील व मुंबई, नवी मुंबईमधील मतदानाची तारीख वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. फक्त शिरुर व मुंबई, नवी मुंबईमधील मतदान एकाच दिवशी असल्यामुळे त्या मतदार संघातील उमेदवारांची मतदार गावी घेऊन जाण्यासाठी कसोटी लागणार आहे.माथाडी मेळाव्याकडेही लक्ष२३ मार्चला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये माथाडी मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचारास आरंभ केला जात होता. यावर्षी माथाडी संघटना भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये विभागली आहे. यामुळे माथाडी मेळाव्यामध्ये नक्की कोणती भूमिका घेतली जाणार याविषयी उत्सुकता असून कामगार माथाडी नेत्यांचे ऐकणार की स्वत:ची भूमिका स्वत: ठरविणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान