शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल

By नारायण जाधव | Updated: January 23, 2024 18:03 IST

सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी : मान्यवरांनी वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती संस्थानतर्फे मंगळवारी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वाशी सेक्टर १७ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात सहायक पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) योगेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी नेताजींचे विचार अमलात आणले तर भारत खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर धावेल, असे विचार व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना उत्तर भारतीय नेते, अभिनेते व माजी सैनिक एस. सी. मिश्रा म्हणाले की, आजचा युवक या आधुनिक युगात राष्ट्रासाठी समर्पित देशभक्तांना विसरत चालला असून, याचा विचार करण्याची गरज आहे.

देशभक्तीची भावना देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे, तरच देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर राहू शकेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपना दलाचे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र वर्मा म्हणाले की, आज आपल्या देशातील शेतकऱ्यांनी इतकी प्रगती केली आहे की, ते शेतीशिवाय बॅटरी, बेअरिंग्ज आणि इतर अनेक सुटे भाग बनवत आहेत. आणि त्यांचा पुरवठा परदेशात करणे. यामुळे देशाच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लागेल.सर्वधर्म विकास मंचचे अध्यक्ष मेघनाथ भगत, भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कोळपकर, जनकल्याण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, अपना दल नवी मुंबई अध्यक्ष आशिष गोस्वामी यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आलेले सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पत्रकार परमानंद सिंग यांनी स्वागत केले. दीक्षा बुक सेंटरचे संचालक दिनेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना भगवत गीता भेट देण्यात आली. या वेळी पत्रकार रामप्रीत राय, अजेंद्र आगरी, जनकल्याण समाज संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष मफतलाल चव्हाण, स्वर्णलता प्रधान, उन्नीकृष्णन, रमेश प्रजापती, आरटीआय कार्यकर्ते विजय नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विनोद प्रधान यांनी केले तर आभार पत्रकार सुरेंद्र सरोज यांनी मानले.