शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल

By नारायण जाधव | Updated: January 23, 2024 18:03 IST

सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी : मान्यवरांनी वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती संस्थानतर्फे मंगळवारी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वाशी सेक्टर १७ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात सहायक पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) योगेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी नेताजींचे विचार अमलात आणले तर भारत खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर धावेल, असे विचार व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना उत्तर भारतीय नेते, अभिनेते व माजी सैनिक एस. सी. मिश्रा म्हणाले की, आजचा युवक या आधुनिक युगात राष्ट्रासाठी समर्पित देशभक्तांना विसरत चालला असून, याचा विचार करण्याची गरज आहे.

देशभक्तीची भावना देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे, तरच देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर राहू शकेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपना दलाचे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र वर्मा म्हणाले की, आज आपल्या देशातील शेतकऱ्यांनी इतकी प्रगती केली आहे की, ते शेतीशिवाय बॅटरी, बेअरिंग्ज आणि इतर अनेक सुटे भाग बनवत आहेत. आणि त्यांचा पुरवठा परदेशात करणे. यामुळे देशाच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लागेल.सर्वधर्म विकास मंचचे अध्यक्ष मेघनाथ भगत, भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कोळपकर, जनकल्याण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, अपना दल नवी मुंबई अध्यक्ष आशिष गोस्वामी यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आलेले सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पत्रकार परमानंद सिंग यांनी स्वागत केले. दीक्षा बुक सेंटरचे संचालक दिनेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना भगवत गीता भेट देण्यात आली. या वेळी पत्रकार रामप्रीत राय, अजेंद्र आगरी, जनकल्याण समाज संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष मफतलाल चव्हाण, स्वर्णलता प्रधान, उन्नीकृष्णन, रमेश प्रजापती, आरटीआय कार्यकर्ते विजय नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विनोद प्रधान यांनी केले तर आभार पत्रकार सुरेंद्र सरोज यांनी मानले.