शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

नेताजींचे विचार अमलात आणले तरच देश प्रगतिपथावर धावेल

By नारायण जाधव | Updated: January 23, 2024 18:03 IST

सुभाषचंद्र बोस यांची १२७ जयंती साजरी : मान्यवरांनी वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती वाशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती संस्थानतर्फे मंगळवारी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम वाशी सेक्टर १७ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या चौकात सहायक पोलीस निरीक्षक (वाहतूक विभाग) योगेश गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नेताजींना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्वच वक्त्यांनी नेताजींचे विचार अमलात आणले तर भारत खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर धावेल, असे विचार व्यक्त केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना उत्तर भारतीय नेते, अभिनेते व माजी सैनिक एस. सी. मिश्रा म्हणाले की, आजचा युवक या आधुनिक युगात राष्ट्रासाठी समर्पित देशभक्तांना विसरत चालला असून, याचा विचार करण्याची गरज आहे.

देशभक्तीची भावना देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे, तरच देश प्रगती आणि विकासाच्या मार्गावर राहू शकेल, असे ते म्हणाले. कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अपना दलाचे महाराष्ट्र प्रभारी महेंद्र वर्मा म्हणाले की, आज आपल्या देशातील शेतकऱ्यांनी इतकी प्रगती केली आहे की, ते शेतीशिवाय बॅटरी, बेअरिंग्ज आणि इतर अनेक सुटे भाग बनवत आहेत. आणि त्यांचा पुरवठा परदेशात करणे. यामुळे देशाच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लागेल.सर्वधर्म विकास मंचचे अध्यक्ष मेघनाथ भगत, भाजपा नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर कोळपकर, जनकल्याण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश शर्मा, अपना दल नवी मुंबई अध्यक्ष आशिष गोस्वामी यांनीही या कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आलेले सहायक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांचे पत्रकार परमानंद सिंग यांनी स्वागत केले. दीक्षा बुक सेंटरचे संचालक दिनेश चव्हाण यांच्या हस्ते त्यांना भगवत गीता भेट देण्यात आली. या वेळी पत्रकार रामप्रीत राय, अजेंद्र आगरी, जनकल्याण समाज संस्थेचे नवी मुंबई अध्यक्ष मफतलाल चव्हाण, स्वर्णलता प्रधान, उन्नीकृष्णन, रमेश प्रजापती, आरटीआय कार्यकर्ते विजय नायर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार विनोद प्रधान यांनी केले तर आभार पत्रकार सुरेंद्र सरोज यांनी मानले.