शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

नव्वद टक्के घरांचे स्थलांतर झाल्यानंतरच प्रकल्पग्रस्तांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:42 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न सध्या महत्त्वाचा बनला आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न सध्या महत्त्वाचा बनला आहे. स्थलांतराला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. काही प्रकल्पग्रस्त आपल्या मागण्यांसाठी अद्यापि आडून बसले आहेत, असे असले तरी दहा गावांतील ९० टक्के घरांचे स्थलांतर झाल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांशी आता संवाद साधला जाणार नाही, अशी भूमिका सिडकोने घेतली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडणाºया दहा गावांचे वहाळ आणि वडघर येथे स्थलांतरण करण्यात येत आहे. या दहा गावांत सुमारे ३००० कुटुंब आहेत. या कुटुंबांना त्यांच्या मूळ घराच्या क्षेत्रफळाच्या तीनपट जमीन नव्याने स्थलांतरित होणाºया क्षेत्रात देण्यात आली आहे. त्याशिवाय अनेक सुविधा देऊ केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत; परंतु अनिर्णीत राहिलेल्या एक दोन मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त अद्यापि नकारात्मक भूमिकेत आहेत. याचा फटका विमानतळ प्रकल्पाला बसत आहे. गावांचे स्थलांतर रखडल्याने विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सकारात्मक भूमिकेतून स्तलांतरण करावे, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. स्थलांतराला विलंब झाला तर विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्धारित वेळेत प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतरण करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. राहिलेल्या एक-दोन मागण्यांबाबतही सिडको सकारात्मक आहे; परंतु ९० टक्के बांधकामे निष्कासित करून, स्थलांतरित झाल्याशिवाय प्रकल्पग्रस्तांशी आता चर्चा नाही, अशी भूमिका सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी घेतली आहे. त्यामुळे विरोध करणाºया प्रकल्पग्रस्तांना आपल्या उरलेल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी दिलेल्या वेळेत स्थलांतरण करणे गरजेचे झाले आहे.१००० कुटुंबांचे स्थलांतरणस्थलांतरित होणाºया कुटुंबांसाठी सिडकोने विशेष प्रोत्साहन भत्ता योजना जाहीर केली. ही योजना तीन टप्प्यांत वर्गीकृत करण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१८ पर्यंत स्थलांतरण करणाºयांना त्यांच्या एकूण निष्कासित बांधकामासाठी ५०० रुपये प्रतिचौरस फूट याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. या टप्प्यात जवळपास १००० कुटुंबे स्थलांतरित झाली. दुसºया व तिसºया टप्प्यासाठी अनुक्रमे एप्रिल आणि मेची मुदत देण्यात आली आहे. एकूणच मे अखेरपर्यंत १०० टक्के स्थलांतरण होणे गरजेचे आहे, त्यानुसार सिडकोने कंबर कसली आहे.