शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत कांद्याची आवक घटली, शेतकरी आंदोलनाचा परिणाम

By नामदेव मोरे | Updated: August 22, 2023 19:01 IST

बाजार समितीमध्ये अक्त ५३२ टन आवक

नवी मुंबई : केंद्र शासनाने निर्यातशुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली आहे. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे.

सहा महिने बाजारभाव मिळत नसल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता. ऑगस्टच्या सुरूवातीला बाजारभाव वाढू लागले असताना अचानक शासनाने निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारभावावर परिणमा होऊ लागला असून राज्यभरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनीही आंदोलनाची भुमीका घेतली आहे. गुरूवारी २४ ऑगस्टला मुंबई बाजार समितीमधील व्यवहारही बंद ठेवले जाणार आहेत.

सोमवारी बाजार समितीमध्ये १४०५ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे. निर्यातशुल्क वाढविल्यामुळे दर पडण्याची शक्यता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात पाठविलेला नाही. सोमवारी नागपंचमीचा सण असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईकडे माल कमी पाठविला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सोमवारी होलसेल मार्केटमध्ये कांदा ८ ते २२ रुपये प्रतीकिलो दराने विकला जात होता. मंगळवारी हेच दर ९ ते २४ रुपये झाले आहेत. बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :onionकांदाNavi Mumbaiनवी मुंबई