शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

एपीएमसीतील कांदा - बटाटा व्यापाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 23:32 IST

मार्केट सुरूच राहणार : १५ जूनपर्यंत कोणतीही कारवाई नाही; न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांना अल्प दिलासा मिळाला आहे. १५ जूनपर्यंत येथील व्यवहार बंद न करण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालय काय आदेश देणार त्यावर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्यात आले आहे. पावसाळ्यात मार्केट कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे १ जूनपासून येथील व्यवहार थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. व्यापाºयांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. मार्केट बंद करण्याची तारीख जवळ आल्यानंतरही पर्यायी व्यवस्था झाली नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले होते. यामुळे सर्वप्रथम पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व नंतर मूळ मार्केटचा वापर थांबविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली होती.

मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरुवारी बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांनी व्यापारी संघटनेबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. १ जूनला तडकाफडकी मार्र्केट बंद करू नये अशी भूमिका मांडण्यात आली. प्रशासनानेही त्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. १५ तारखेपर्यंत मार्केट सुरूच ठेवले जाणार आहे. या विषयी व्यापाºयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे व्यापाºयांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मीटिंगविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासक व सचिवांशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

पर्यायी व्यवस्थेची गरजकांदा-बटाटा मार्केटमुळे जवळपास पाच हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. मार्केट १ जूनपासून बंद करण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे माथाडी कामगारांसह अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे जोपर्यंत मार्केटसाठी पर्यायी व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मूळ मार्केट बंद करू नये, अशी भूमिका माथाडी संघटनेनेही घेतली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती