शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीतील कांदा - बटाटा व्यापाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 23:32 IST

मार्केट सुरूच राहणार : १५ जूनपर्यंत कोणतीही कारवाई नाही; न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांना अल्प दिलासा मिळाला आहे. १५ जूनपर्यंत येथील व्यवहार बंद न करण्याचा निर्णय घेतला असून, न्यायालय काय आदेश देणार त्यावर पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषित करण्यात आले आहे. पावसाळ्यात मार्केट कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता असल्यामुळे १ जूनपासून येथील व्यवहार थांबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. व्यापाºयांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. मार्केट बंद करण्याची तारीख जवळ आल्यानंतरही पर्यायी व्यवस्था झाली नसल्यामुळे व्यापारी हवालदिल झाले होते. यामुळे सर्वप्रथम पर्यायी व्यवस्था करण्यात यावी व नंतर मूळ मार्केटचा वापर थांबविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी व्यापाºयांनी केली होती.

मार्केटमधील प्रश्न सोडविण्यासाठी गुरुवारी बाजार समितीचे प्रशासक सतीश सोनी, सचिव अनिल चव्हाण यांनी व्यापारी संघटनेबरोबर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. १ जूनला तडकाफडकी मार्र्केट बंद करू नये अशी भूमिका मांडण्यात आली. प्रशासनानेही त्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली आहे. १५ तारखेपर्यंत मार्केट सुरूच ठेवले जाणार आहे. या विषयी व्यापाºयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे व्यापाºयांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मीटिंगविषयी माहिती घेण्यासाठी प्रशासक व सचिवांशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

पर्यायी व्यवस्थेची गरजकांदा-बटाटा मार्केटमुळे जवळपास पाच हजार नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. मार्केट १ जूनपासून बंद करण्याची चर्चा सुरू झाल्यामुळे माथाडी कामगारांसह अनेकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यामुळे जोपर्यंत मार्केटसाठी पर्यायी व्यवस्था होणार नाही तोपर्यंत मूळ मार्केट बंद करू नये, अशी भूमिका माथाडी संघटनेनेही घेतली आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती