शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

एपीएमसीतील कांदा - बटाटा मार्केट स्थलांतराचा पेच कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:17 IST

एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमधील व्यवहार १ जूनपासून थांबविण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबई : एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमधील व्यवहार १ जूनपासून थांबविण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. मुदत संपण्यासाठी चार दिवस शिल्लक असून अद्याप स्थलांतरासाठी प्रशासनाने ठोस पर्यायी व्यवस्थाच केलेली नाही. यामुळे मार्केट बंद केल्यास व्यापार कुठे करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने ठोस पर्यायी व्यवस्था करूनच मोडकळीस आलेल्या मार्केटचा वापर थांबवावा अशी भूमिका माथाडी संघटनेनेही घेतली आहे.मुंबई बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुंबईमधील कृषी व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९८१ मध्ये कांदा - बटाटा मार्केटचे स्थलांतर झाले. पण २० वर्षांमध्ये इमारतीच्या स्लॅबला तडे जावू लागले. महापालिकेने २००३ मध्ये काही विंग धोकादायक घोषित केल्या व नंतर संपूर्ण मार्केटच अतिधोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले. मार्केट पुनर्बांधणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला असताना प्रशासनाने १ जूनपासून येथील सर्व व्यवहार बंद करण्याची नोटीस व्यापाऱ्यांना दिली आहे.मार्केटमधील आवक थांबविण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. व्यापारासाठी मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूचा भूखंड व लिलावगृहामध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मोकळ्या भूखंडावर १४० व लिलावगृहामध्ये ९० व्यापाऱ्यांची सोय करण्यात येणार आहे, परंतु व्यापार थांबविण्यासाठी दिलेली मुदत संपत आल्यानंतरही अद्याप पर्यायी जागेवर काहीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.मार्केटमध्ये रोज २५० ते ३५० ट्रक व टेम्पोमधून कांदा, बटाटा व लसूणची आवक होत असते. जवळपास ४०० टेम्पोमधून हा माल मुंबईमध्ये विक्रीसाठी जात असतो. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केलेल्या भूखंडावर प्रत्येक व्यापाºयाला जास्तीत जास्त २०० चौरस फुटाची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या जागेवर कृषी माल ठेवणेही शक्य होणार नाही. माल ठेवण्यासाठीही जागा नसेल तर व्यापार कसा व कुठे करायचा असा प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी न्यायालयातही धाव घेतली आहे. प्रशासनाने मार्केट बंद करण्याची घाई करू नये अशी मागणीही केली आहे. मार्केटमधील व्यवहार थांबविले तर माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम होणार आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननेही प्रशासनाला पत्र दिले आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सर्व घटकांना विश्वासात घेण्यात यावे. सक्षम पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच मार्केट स्थलांतर केले जावे. घाई करून निर्णय घेतल्यास व त्यामुळे कामगार व मार्केटचे नुकसान झाल्यास त्याला पूर्णपणे बाजार समिती प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे. याविषयी बाजार समिती सचिव अनिल चव्हाण यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला, परंतु संपर्क होवू शकला नाही.>भूखंडावर डेब्रिजचे ढिगारेएपीएमसीने १४० व्यापाºयांची पर्यायी व्यवस्था मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूच्या भूखंडावर करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या भूखंडावर सद्यस्थितीमध्ये काहीही उपाययोजना केलेली नाही. जुन्या इमारती पाडून त्याचे डेब्रिज भूखंडावर अंथरण्यात आले आहे. याठिकाणी व्यापारासाठी आवश्यक रचना व शेड उभे करण्यासाठी काही महिने लागण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यायी व्यवस्था केली असल्याचा प्रशासनाचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने व्यापाºयांना १० ते १५ दिवसांची मुदत देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु यावेळेतही पर्यायी व्यवस्था होवू शकणार नाही अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली आहे.>कांदा - बटाटा मार्केटमधील व्यापार १ जूनपासून थांबविण्याचे पत्र प्रशासनाने व्यापाºयांना दिले आहे, परंतु प्रत्यक्षात सक्षम पर्यायी व्यवस्था केलेली नाही. पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय मूळ मार्केटमधील कामकाज थांबवू नये. सर्वांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्यास पुढील परिणामांना पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.- रविकांत पाटील,संयुक्त सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन