शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

गाई चोरल्याच्या संशयातून एकाची हत्या, तिघांना अटक

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 15, 2024 17:51 IST

नवी मुंबई : अडवली भुतवली येथील पारधी वस्तीमध्ये एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक ...

नवी मुंबई : अडवली भुतवली येथील पारधी वस्तीमध्ये एकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीने गाई चोरल्याचा संशयातून त्याला मारहाण केल्याचे तिघांनी मान्य केले आहे. 

रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत मंगळवारी हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणाऱ्या ठाकूर (४५) नावाच्या व्यक्तीचा मृतदेह राहत्या घरात मिळून आला होता. याची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. पाहणीमध्ये या व्यक्तीच्या शरीरावर जखमा दिसून आल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिघांनी त्यांना रिक्षात कोंबून अपहरण करून नेले होते असे समोर आले. त्यानंतर काही वेळानी पुन्हा त्यांनीच मृत अवस्थेतील ठाकूर यांना राहत्या घरात टाकून पळ काढला होता. त्याद्वारे पोलिसांनी शिरवणे एमआयडीसी परिसरातील दोन तबेले चालक व एक रिक्षाचालक अशा तिघांना अटक केली आहे.

उमाकांत गौड (५१), जयप्रकाश गौड (२५) व नागेश इंगळे (१९) अशी त्यांची नावे आहेत. उमाकांत याच्या तबेल्यातून काही महिन्यांपूर्वी तीन गाई चोरीला गेल्या होत्या. या गाई अडवली भुतवली येथील पारधी वस्तीत राहणाऱ्या ठाकूर याने चोरल्याचा त्यांना संशय होता. यातून त्यांनी त्याच्या अपहरणाचा कट रचून रिक्षातून निर्मनुष्य ठिकाणी नेले. त्याठिकाणी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पुन्हा त्यांच्या घरात टाकून पळ काढला होता. त्यानुसार तिघांनाही अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले. ठाकूर हे त्याठिकाणी एकटेच रहायला होते. परिसरातील तबेल्यांमध्ये मिळेल ते काम करून उपजीविका भागवायचे. मात्र त्यांची पूर्ण ओळख पटेल असा कोणताही कादोपत्री पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.   

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी