शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

एपीएमसीमधील मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा एकदिवसीय कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 01:50 IST

संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी; धान्य मार्केटमधील व्यापारी संघटनांचा सहभाग

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व सर्व कृषी व्यापार नियमनमुक्त करावा, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी मंगळवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्राने एपीएमसीबाहेर व्यापार करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्के ट आवारापुरते मर्यादित केले आहे. यामुळे भविष्यात एपीएमसीमधील व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटमधील कृषी व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेड या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले होते.

दिवसभर दोन्ही मार्केट बंद होते. भाजीपाला, फळ व कांदा-बटाटा मार्केटला बंदमधून वगळले होते. राज्यातील अनेक व्यापाऱ्यांसह मुंबईबाहेरील अनेक मार्केटमधील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते.कृषी मालाच्या व्यापारासाठी सर्वांना समान नियम हवेत. एपीएमसीबाहेर नियमनमुक्ती व एपीएमसीमध्ये नियमन लावणे योग्य नाही. संपूर्ण नियमनमुक्तीचा निर्णय घेऊन सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले होते. - कीर्ती राणा, अध्यक्ष, नवी मुंबई मर्चंट चेंबरशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या बंदमध्ये धान्य मार्केटमधील व्यापारीही सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीव्यापाºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. मुंबईसह राज्यातील अनेक मार्के ट बंद ठेवण्यात आली होती. शासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. - मोहन गुरनानी, अध्यक्ष - चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती