शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

एपीएमसीमधील मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा एकदिवसीय कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 01:50 IST

संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी; धान्य मार्केटमधील व्यापारी संघटनांचा सहभाग

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व सर्व कृषी व्यापार नियमनमुक्त करावा, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी मंगळवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्राने एपीएमसीबाहेर व्यापार करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्के ट आवारापुरते मर्यादित केले आहे. यामुळे भविष्यात एपीएमसीमधील व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटमधील कृषी व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड ट्रेड या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले होते.

दिवसभर दोन्ही मार्केट बंद होते. भाजीपाला, फळ व कांदा-बटाटा मार्केटला बंदमधून वगळले होते. राज्यातील अनेक व्यापाऱ्यांसह मुंबईबाहेरील अनेक मार्केटमधील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते.कृषी मालाच्या व्यापारासाठी सर्वांना समान नियम हवेत. एपीएमसीबाहेर नियमनमुक्ती व एपीएमसीमध्ये नियमन लावणे योग्य नाही. संपूर्ण नियमनमुक्तीचा निर्णय घेऊन सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले होते. - कीर्ती राणा, अध्यक्ष, नवी मुंबई मर्चंट चेंबरशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या बंदमध्ये धान्य मार्केटमधील व्यापारीही सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीव्यापाºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. मुंबईसह राज्यातील अनेक मार्के ट बंद ठेवण्यात आली होती. शासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. - मोहन गुरनानी, अध्यक्ष - चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती