शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पनवेल महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची फिल्डिंग

By admin | Updated: June 22, 2016 02:17 IST

पनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे

अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोलीपनवेल महानगरपालिकेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला असून अखेरच्या दिवसापर्यंत ३९५७ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच पनवेल महापालिका अस्तित्वात येणार असून त्यासाठी अधिकाऱ्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पनवेल पालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी ते खुर्चीला चिकटून आहेत. सत्ताधाऱ्यांच्या शिफारशी घेवून याच ठिकाणी राहण्याकरिता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. केडरवाले सुध्दा पनवेल महापालिकेत काम करण्यासाठी उत्सुक आहेत. ही महानगरपालिका ‘ड’ वर्गाची असल्याने जवळपास साडेबाराशेच्या वर मनुष्यबळ लागणार आहे. त्यामध्ये आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, निरीक्षक, अधीक्षक, टंकलेखक, कारकुनांचा समावेश आहे. पनवेल नगरपालिकेत केडर त्याचबरोबर विना केडर अशा दोन प्रकारचे कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. केडरवाल्यांची दुसरीकडे बदली होणे अपेक्षित असताना कित्येकजण अजूनही पनवेल पालिकेत काम करीत आहेत. पालिकेचे उपमुख्याधिकारी डॉ. भगवान खाडे यांची बदली दुसरीकडे झाली असताना ते पनवेलला राहण्यास इच्छुक आहेत. प्रशासकीय अधिकारी गणेश साळवे यांच्यासह इतर केडरवाले कित्येक वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. पालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी चारुशीला पंडित यांची सुध्दा मागील आठवड्यात ठाणे महानगरपालिकेत बदली झाली आहे. परंतु ही बदली थांबविण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सुरेंद्र उईके नावाच्या अनुभवी अभियंत्याची बदली रत्नागिरी नगरपालिकेत करण्यात आली. या अधिकाऱ्यांना थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवर शिफारशी करण्यात येत आहेत.