शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई

By admin | Updated: October 1, 2015 02:03 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन करण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी स्वत: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसराची साफसफाई केली. यावेळी आरोग्य रक्षणासाठी मास्क, हातमोजे यांचा वापर केला. परंतु दुसरीकडे वर्षानुवर्षे कचरा वेचण्याचे व सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना मात्र या सुविधा अद्याप मिळत नाहीत. नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छतेचे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्येही शहराचा समावेश झाला असून देशात तिसरे मानांकन मिळाले आहे. या अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात साफसफाई मोहीम राबविली. पालिका प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्वच नागरिकांनी स्वागत केले. स्वत: मोहिमेत भाग घेवून अधिकाऱ्यांनी शहरवासीयांना स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी वैयक्तिक व शहर स्वच्छतेची शपथ घेतली. एक दिवसाच्या स्वच्छता मोहिमेसाठी अधिकाऱ्यांनी पांढरे शुभ्र टी शर्ट, हातमोजे, तोंडावर मास्क, पायात बुट सुस्थितीमध्ये असलेले झाडू घेवून परिसर साफ केला. परंतु दुसरीकडे रोज साफसफाईचे व कचरा उचलण्याचे काम करणारे कर्मचारी मात्र पुरेशा सुविधा नसतानाही हे काम करत आहेत. शहरातील कंत्राटी कामगारांच्या तोंडाला मास्क, हातात मोजे व पायात बुट कधीच दिसत नाहीत. कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून अनेकांना श्वसनाचे व इतर आजार झाले आहेत. शहर स्मार्ट बनविण्यासाठी या कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक सुविधा कधी मिळणार असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)