शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

...आता ठाणे-बेलापूर रस्त्यावरून थेट जा ऐरोली-काटई महामार्गावर, नवी मुंबईकरांच्या मागणीला यश

By नारायण जाधव | Updated: April 4, 2023 18:44 IST

अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे.

नवी मुंबई - मुंबईकरांना थेट कल्याण-डोंबिवलीत विनाविलंब जाता यावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून १४४१.३९ काेटी खर्चाच्या ऐरोली-काटई या १२.३ किमीच्या मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, हा मार्ग नवी मुंबईतून जात असूनही त्याच्या आराखड्यात त्यावर चढ-उतारासाठी मार्गिका नसल्याने नवी मुंबईकरांत तीव्र असंतोष होता. याबाबत नवी मुंबई महापालिकेसह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अनेकदा ‘एमएमआरडीए’सह मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला. अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे. ‘एमएमआरडीए’ने मार्च महिन्यात झालेल्या १५४ व्या बैठकीत यासाठीच्या वाढीव ५३ कोटी ४७ लाख ५१ हजार ८७ रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांतील वाहतूक गतिमान व्हावी, २०१४ मध्ये १७ कामांसाठी ३६५८ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. यात ऐरोली ते काटई मार्गासाठी भूसंपादनाव्यतिरिक्त ९४४ कोटी २० रुपयांचा समावेश होता. हा मार्ग तीन भागांत बांधण्यात येत असून, आता त्याच्या भाग-१ व २ साठी १४४१ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास डिसेंबर २०२२ मध्ये मंजुरी दिली आहे.ऐरोली-काटई मार्गाचे टप्पे

टप्पा क्रमांक १ मध्ये ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ याची लांबी ३.४३ किमी आहे.

टप्पा क्रमांक २ मध्ये ऐरोली खाडीपूल ते ठाणे बेलापूरपर्यंतचा उन्नत रस्त्याची लांबी २.५३ किमी

टप्पा क्रमांक ३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई जंक्शन ६.३० किमी

नवी मुंबई महापालिकेने तयार केला अहवाल

ऐरोली-काटई मार्गावर चढ-उतारसाठी नवी मुंबईकरांना ‘एमएमआरडीए’ने आपल्या आराखड्यात मार्गिकाच ठेवली नव्हती. यामुळे हा महत्त्वाचा मार्ग नवी मुंबई शहरातून जात असूनही त्याचा शहरवासीयांना काहीही लाभ घेता येणार नव्हता. ना त्यांना मुंबईत जाणे सोपे होणार होते ना कल्याण-डोंबिवलीत. यामुळे स्थानिक लाेकप्रतिनिधींत तीव्र असंतोष होता. अखेर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या मागणीवरून नवी मुंबई महापालिकेने जोड मार्गिका कोठून करणे शक्य होईल, याबाबत आकार अनुभव कन्सल्टंट यांनी सुसाध्यता अहवाल तयार केला. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने ‘एमएमआरडीए’कडे प्रस्ताव पाठविला होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जोड मार्गिका

सल्लागरांनी दिलेल्या अहवालानुसार ऐरोली-काटई महामार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जाेड मार्गिका केल्यास तिचा केवळ नवी मुंबईकरानाच नव्हे, तर ठाण्याकडून ये-जा करणाऱ्या वाहतुकीस मुंबईसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-भिवंडीकडे ये-जा करण्यासाठी लाभ घेता येईल; तसेच ऐरोली-काटई महामार्ग विरार-अलिबाग मल्टिमोडल काॅरिडोरलाही छेदणार आहे. यामुळे एकंदरीतच वाहतुकीचे मोठे विभाजन होऊन ‘एमएमआरडीए’ क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.