शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...आता ठाणे-बेलापूर रस्त्यावरून थेट जा ऐरोली-काटई महामार्गावर, नवी मुंबईकरांच्या मागणीला यश

By नारायण जाधव | Updated: April 4, 2023 18:44 IST

अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे.

नवी मुंबई - मुंबईकरांना थेट कल्याण-डोंबिवलीत विनाविलंब जाता यावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून १४४१.३९ काेटी खर्चाच्या ऐरोली-काटई या १२.३ किमीच्या मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, हा मार्ग नवी मुंबईतून जात असूनही त्याच्या आराखड्यात त्यावर चढ-उतारासाठी मार्गिका नसल्याने नवी मुंबईकरांत तीव्र असंतोष होता. याबाबत नवी मुंबई महापालिकेसह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अनेकदा ‘एमएमआरडीए’सह मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला. अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे. ‘एमएमआरडीए’ने मार्च महिन्यात झालेल्या १५४ व्या बैठकीत यासाठीच्या वाढीव ५३ कोटी ४७ लाख ५१ हजार ८७ रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांतील वाहतूक गतिमान व्हावी, २०१४ मध्ये १७ कामांसाठी ३६५८ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. यात ऐरोली ते काटई मार्गासाठी भूसंपादनाव्यतिरिक्त ९४४ कोटी २० रुपयांचा समावेश होता. हा मार्ग तीन भागांत बांधण्यात येत असून, आता त्याच्या भाग-१ व २ साठी १४४१ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास डिसेंबर २०२२ मध्ये मंजुरी दिली आहे.ऐरोली-काटई मार्गाचे टप्पे

टप्पा क्रमांक १ मध्ये ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ याची लांबी ३.४३ किमी आहे.

टप्पा क्रमांक २ मध्ये ऐरोली खाडीपूल ते ठाणे बेलापूरपर्यंतचा उन्नत रस्त्याची लांबी २.५३ किमी

टप्पा क्रमांक ३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई जंक्शन ६.३० किमी

नवी मुंबई महापालिकेने तयार केला अहवाल

ऐरोली-काटई मार्गावर चढ-उतारसाठी नवी मुंबईकरांना ‘एमएमआरडीए’ने आपल्या आराखड्यात मार्गिकाच ठेवली नव्हती. यामुळे हा महत्त्वाचा मार्ग नवी मुंबई शहरातून जात असूनही त्याचा शहरवासीयांना काहीही लाभ घेता येणार नव्हता. ना त्यांना मुंबईत जाणे सोपे होणार होते ना कल्याण-डोंबिवलीत. यामुळे स्थानिक लाेकप्रतिनिधींत तीव्र असंतोष होता. अखेर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या मागणीवरून नवी मुंबई महापालिकेने जोड मार्गिका कोठून करणे शक्य होईल, याबाबत आकार अनुभव कन्सल्टंट यांनी सुसाध्यता अहवाल तयार केला. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने ‘एमएमआरडीए’कडे प्रस्ताव पाठविला होता.

ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जोड मार्गिका

सल्लागरांनी दिलेल्या अहवालानुसार ऐरोली-काटई महामार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जाेड मार्गिका केल्यास तिचा केवळ नवी मुंबईकरानाच नव्हे, तर ठाण्याकडून ये-जा करणाऱ्या वाहतुकीस मुंबईसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-भिवंडीकडे ये-जा करण्यासाठी लाभ घेता येईल; तसेच ऐरोली-काटई महामार्ग विरार-अलिबाग मल्टिमोडल काॅरिडोरलाही छेदणार आहे. यामुळे एकंदरीतच वाहतुकीचे मोठे विभाजन होऊन ‘एमएमआरडीए’ क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.