शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आता राज्यातच घ्या तंबूत राहण्याचा आनंद; रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर गुजरातची कंपनी उभारणार टेंट सिटी

By नारायण जाधव | Updated: October 25, 2023 10:36 IST

राज्यातच आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. 

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांना तंबूतील निवासाचा आनंद लुटण्यासाठी आता लेह, लडाख, राजस्थान किंवा कच्छच्या रणात जाण्याची गरज नाही. राज्यातच आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. 

राज्याच्या नव्या पर्यटन धोरणांतर्गत एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बांधा-वापरा-संचलन’ तत्त्वावर खासगीकरणातून तिचे काम गुजरातमधील एका कंपनीस दिले आहे.

अलिबागला लागूनच असलेल्या किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर टेंट बांधण्याचे कंत्राट एमटीडीसीने अहमदाबादच्या प्रवेग लिमिटेड या कंपनीस दिले आहे. इकोफ्रेंडली आरामदायी हॉटेल्स आणि टेंटसह रिसॉर्ट बांधण्याचे काम ही कंपनी करते.

किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर एमटीडीसीच्या मालकीच्या साडेसहा एकरावर ५ वर्षांत ४० उच्च दर्जाचे आरामदायी टेंट उभारले जातील. तसेच सभागृह, रेस्टॉरंट, डायनिंग एरिया, इनडोअर, आउटडोअर करमणूक उपक्रम, योगा, आयुर्वेदिक उपचार, सांस्कृतिक केंद्र, वैद्यकीय कक्ष असेल.

पर्यटनाला मिळणार चालना

मुंबई आणि पुण्यानजीकचा आणि ऐतिहासिक रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ल्यासह कुलाबा, खंदेरी, उंदेरी सारखे अनेक गडकोट असलेला जिल्हा म्हणून रायगड ओळखला जातो. जिल्ह्यात अलिबाग, किहीम, काशीद, मुयड-जंजिरा, श्रीवर्धन-म्हसळासारखी सुंदर बिचेस आहेत. याशिवाय कर्नाळा पक्षी अभयारण्यासह प्राचीन मंदिरे, ज्यू संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि ब्रिटिशांनी स्थापन केलेली दीडशे वर्षे जुनी भूचुंबकीय वेधशाळेसह नानाविध पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. बोटीनेही येथे मुंबई, नवी मुंबईतून ये-जा करता येते. रेवस-मांडवाहून मोरा, मुंबई भाऊचा धक्का अशी जलवाहतुकीची सोय येथून आहे. आता याच जिल्ह्यात टेंट सिटी बांधण्यात येत असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आपसूक चालना मिळणार आहे.

 

टॅग्स :Raigadरायगड