शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
3
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
4
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
5
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
6
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
7
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
8
गांजा, दारू आणि नको त्या अवस्थेत...; रेव्ह पार्टीवर धाड, तरुण-तरुणींसह ६५ जण पोलिसांच्या ताब्यात
9
Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
10
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
11
विमानात बिघाड झाल्यानंतर सक्रिय होणारा 'RAT' नेमका आहे काय? काय आहे त्यात विशेष? जाणून घ्या...
12
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
13
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
14
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
16
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
17
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
18
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
19
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
20
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."

तलाठी कार्यालय हटविण्याच्या नोटिसा

By admin | Updated: January 26, 2017 03:34 IST

पनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या

मयूर तांबडे / पनवेलपनवेल तहसीलदार कार्यालयात गेली कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या तलाठी व मंडळ अधिकारी यांना तहसीलमधून कार्यालये हलवण्याच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना आपला बोजा बिस्तरा गुंडाळावा लागणार आहे. पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांनी तशा नोटिसा तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिल्या आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयात चिकटून बसलेल्या तलाठ्यांना आपापल्या सजामध्ये जावे लागणार आहे.पनवेल तालुका हा लोकसंख्येच्या तुलनेत मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे नागरिकांची तलाठ्यांकडे नेहमीच कामे असतात. सातबारा तसेच त्याच्याशी निगडित अन्य कामे तलाठी तसेच मंडळ अधिकारी याच्यामार्फत होत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून तलाठी व मंडळ अधिकारी सजेच्या ठिकाणी न बसता तहसील कार्यालयात बसत आहेत. त्यामुळे आपल्या दूरच्या गावावरून नागरिकांना पनवेलला यावे लागत आहे. गावातील सजा सोडून पनवेलला यावे लागत असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतात. पनवेलमध्ये सद्यस्थितीत ६९ ग्रामपंचायती असून १७७ गावे व वाड्या आहेत. तसेच ३५ तलाठी सजा व ५ मंडळ अधिकारी आहेत. पनवेलमधील ग्रामीण नागरिकांना सातबारा, फेरफार, अर्जाची चौकशी, उत्पन्नाच्या दाखल्याची चौकशी, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलिअर दाखले, शेतकरी दाखले इत्यादि कामांसाठी आपल्या गावापासून पनवेलपर्यंतची दूरवरची पायपीट करावी लागत आहे. तसेच काही वेळेला तलाठी न भेटल्यामुळे पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात. महसूल प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. गावपातळीवर लोकांच्या अडीअडचणीत उपयोगी पडणारे अनेक गावचे तलाठी भाऊसाहेब तहसीलदार कार्यालयात बसूनच काम पाहत होते. त्यामुळे पनवेल तहसील कार्यालयातून तलाठी व मंडळ अधिकारी यांना पनवेल तहसीलमधून कार्यालये हलवून सजेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले आहे. नागरिकांचे प्रश्न व अडीअडचणी लक्षात घेऊन तहसीलदारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.पनवेलची व्याप्ती मोठी आहे. अनेक गावे पनवेल शहरापासून लांब आहेत. त्यातच तलाठी आपल्या सजेचे ठिकाण सोडून पनवेल तहसील कार्यालयात बसत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने निर्णय घेतला.