शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:36 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई  - सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. भुयारी मार्गात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून, महापालिकेने केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते, या ठिकाणी महामार्ग ओलांडणाºया नागरिकांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने ये-जा करणाºया वाहनांमुळे नागरिकांचे रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला होता, त्याला अनुसरून भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामाला महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळवून, चारही भुयारी मार्गाची सुधारणा केली होती. या कामासाठी महापालिकेने तब्बल ४३ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गात करावी लागणारी चढ-उतर, ही प्रवासी नागरिकांना त्रासदायक वाटत असल्याने त्यांनी या भुयारी मार्गाकडे पाठ फिरवली आहे.नेरु ळ एलपी येथील दोन भुयारी मार्गांना गर्दुल्ल्यांनी आपला अड्डे बनविले आहेत. या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि जुगार खेळला जातो, तसेच या भुयारी मार्गाची पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता होत नसल्याने कचरा, मद्य बाटल्यांच्या फुटलेल्या काचा पडलेल्या आहेत. नेरु ळ एसबीआय कॉलनीसमोरील भुयारी मार्गातही कचरा साचला असून, भुयारी मार्गाच्या आतील भागात घाण केली जात आहे.उरण फाटा येथील भुयारी मार्गात साचणाºया पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना न केल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.सीसीटीव्हीची मोडतोड; कारवाईची मागणीसायन-पनवेल महामार्गावर भुयारी मार्गाचा वापर करताना अडचणी येऊ नयेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु या गर्दुल्ल्यांनी या ठिकाणच्या सीसीटीव्हीची मोडतोड केली आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासून, अशा उपद्रवी जुगारी आणि मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या