शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:36 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई  - सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. भुयारी मार्गात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून, महापालिकेने केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते, या ठिकाणी महामार्ग ओलांडणाºया नागरिकांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने ये-जा करणाºया वाहनांमुळे नागरिकांचे रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला होता, त्याला अनुसरून भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामाला महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळवून, चारही भुयारी मार्गाची सुधारणा केली होती. या कामासाठी महापालिकेने तब्बल ४३ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गात करावी लागणारी चढ-उतर, ही प्रवासी नागरिकांना त्रासदायक वाटत असल्याने त्यांनी या भुयारी मार्गाकडे पाठ फिरवली आहे.नेरु ळ एलपी येथील दोन भुयारी मार्गांना गर्दुल्ल्यांनी आपला अड्डे बनविले आहेत. या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि जुगार खेळला जातो, तसेच या भुयारी मार्गाची पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता होत नसल्याने कचरा, मद्य बाटल्यांच्या फुटलेल्या काचा पडलेल्या आहेत. नेरु ळ एसबीआय कॉलनीसमोरील भुयारी मार्गातही कचरा साचला असून, भुयारी मार्गाच्या आतील भागात घाण केली जात आहे.उरण फाटा येथील भुयारी मार्गात साचणाºया पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना न केल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.सीसीटीव्हीची मोडतोड; कारवाईची मागणीसायन-पनवेल महामार्गावर भुयारी मार्गाचा वापर करताना अडचणी येऊ नयेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु या गर्दुल्ल्यांनी या ठिकाणच्या सीसीटीव्हीची मोडतोड केली आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासून, अशा उपद्रवी जुगारी आणि मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या