शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

महामार्गावरील भुयारी मार्गांचा वापर नाही, पालिकेच्या लाखो रु पयांचा खर्च गेला व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:36 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई  - सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल महामार्गावर अपूर्ण काम केलेल्या चार भुयारी मार्गांची पालिकेने लाखो रु पये खर्च करून डागडुजी केली आहे; परंतु भुयारी मार्गातून ये-जा करताना चढ-उतर करावे लागत असल्याने पादचाऱ्यांनी महामार्ग ओलांडणे पसंत केले आहे. भुयारी मार्गात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून, महापालिकेने केलेला खर्च व्यर्थ गेला आहे.सायन-पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते, या ठिकाणी महामार्ग ओलांडणाºया नागरिकांची संख्याही मोठी आहे. महामार्गावरून भरधाव वेगाने ये-जा करणाºया वाहनांमुळे नागरिकांचे रस्ता ओलांडताना अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविला होता; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला होता, त्याला अनुसरून भुयारी मार्ग दुरुस्तीच्या कामाला महापालिकेच्या महासभा आणि स्थायी समितीची मंजुरी मिळवून, चारही भुयारी मार्गाची सुधारणा केली होती. या कामासाठी महापालिकेने तब्बल ४३ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्गात करावी लागणारी चढ-उतर, ही प्रवासी नागरिकांना त्रासदायक वाटत असल्याने त्यांनी या भुयारी मार्गाकडे पाठ फिरवली आहे.नेरु ळ एलपी येथील दोन भुयारी मार्गांना गर्दुल्ल्यांनी आपला अड्डे बनविले आहेत. या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर मद्यपान आणि जुगार खेळला जातो, तसेच या भुयारी मार्गाची पालिकेच्या माध्यमातून स्वच्छता होत नसल्याने कचरा, मद्य बाटल्यांच्या फुटलेल्या काचा पडलेल्या आहेत. नेरु ळ एसबीआय कॉलनीसमोरील भुयारी मार्गातही कचरा साचला असून, भुयारी मार्गाच्या आतील भागात घाण केली जात आहे.उरण फाटा येथील भुयारी मार्गात साचणाºया पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना न केल्याने पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण झाला आहे.सीसीटीव्हीची मोडतोड; कारवाईची मागणीसायन-पनवेल महामार्गावर भुयारी मार्गाचा वापर करताना अडचणी येऊ नयेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते; परंतु या गर्दुल्ल्यांनी या ठिकाणच्या सीसीटीव्हीची मोडतोड केली आहे. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालिकेने सीसीटीव्ही फुटेज तपासून, अशा उपद्रवी जुगारी आणि मद्यपींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या