शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

अडगळीच्या ठिकाणी स्वच्छता करण्यास महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 06:12 IST

वाढलेले गवत, डेब्रिजमुळे नागरी वस्तीत सापांचा वावर

नवी मुंबई : शहरात स्वच्छता अभियान राबवून देशात नावलौकिक कमविणाऱ्या नवी मुंबई शहरातील अडगळीच्या भागात स्वच्छता करण्यास महापालिकेला विसर पडला असून डेब्रिज, गवत वाढल्याने नागरी वस्तींमध्ये सापांचा वावर वाढला आहे. ऊन पडू लागल्याने अडगळीच्या ठिकाणी दृष्टीस पडणारे साप आता नागरी वस्ती, तसेच पालिकेच्या वास्तूंमध्ये देखील प्रवेश करू लागले आहेत. सानपाडा येथे झोपडपट्टी भागात राहणाºया ३६ वर्षीय एका महिलेला विषारी नाग चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, महापालिकेने शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.

केंद्र शासनामार्फत देशात राबविण्यात येणाºया स्वच्छ भारत मिशन कार्यक्र माअंतर्गत २0१७ साली शहराचा देशात आठवा तर राज्यात पहिला क्र मांक पटकाविला होता. शहरात स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु शहरात वाढलेले गवत, पडलेले डेब्रिज अशा ठिकाणी उंदरांच्या शोधात सापांचा वावर वाढला आहे. सध्या पडत असलेल्या उन्हामुळे साप जवळ असलेल्या नागरी वस्ती आणि पालिकांच्या वास्तूंमध्ये शिरू लागले आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी डोंगराळ, खाडी भाग आहे. सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारे पावसाचे पाणी आणि एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारे मोठे नाले देखील आहेत. पालिकेचे मलनि:सारण केंद्र, महापालिकेच्या जलकुंभांचे आवार, नाले परिसरात झुडपे वाढली असून गवत देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात सीबीडी सेक्टर ४ मधील महापालिकेच्या वाचनालयाच्या आवारात दोन नाग आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाचनालयाच्या मागे पावसाळी नाला असून या नाल्याच्या भोवती मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. पालिकेच्या शिरवणे येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आवारात देखील नुकतीच साप पकडण्याची घटना घडली आहे. या नागरी आरोग्य केंद्राच्या शेजारी रेल्वे लाइन असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. सानपाडा सेक्टर २0 मधील मलनि:सारण केंद्रासमोरील झोपडपट्टी भागात राहणाºया सेहजानबीबी कमल शेख या ३६ वर्षीय महिलेला बुधवारी (ता.२६) विषारी नाग चावल्याची घटना घडली आहे. नागाच्या दंशानंतर अवघ्या काही वेळात या महिलेचा मृत्यू झाला आहे.पालिका वास्तूंच्या आवारात अडगळनवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण केंद्र, जलकुंभ, शाळा, विभाग कार्यालये, वाचनालय, नागरी आरोग्य केंद्र यामधील अनेक वास्तू, नाले, खाडी, डेब्रिज पडलेले ओस भूखंड आदींच्या शेजारील वास्तूंच्या भोवती महापालिकेचे पडलेले भंगार साहित्य, अतिक्र मण विभागाने जप्त केलेले साहित्य, भंगार वाहने, वाढलेली झुडपे आणि गवत यामुळे देखील अडगळ निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई