शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आक्सा बीच समुद्री भिंतीविरुद्धची याचिका एनजीटीने स्वीकारली; मेरिटाईम बोर्ड, सीआरझेडसह परिवेश समितीला नोटीस

By नारायण जाधव | Updated: July 5, 2023 15:52 IST

ही भिंत महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मंजुरीचेदेखील उल्लंघन करत आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मालाड येथील आक्सा बीचवर बांधण्यात येत असलेल्या समुद्री भिंतीमुळे होणाऱ्या विपरीत परिणामाची दखल घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटीने) बांधकामाला आव्हान देणारी पर्यावरणवाद्यांची याचिका स्वीकारली आहे. या बांधकामात पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाल्याचे सांगून एनजीटीने मेरिटाईम बोर्ड, सीआरझेड प्राधिकरण, पर्यावरण विभाग आणि परिवेश समितीला नोटीस बजावून त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

एनजीटीच्या पश्चिम पीठाने सोमवारी नवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार आणि मुंबई स्थित पर्यावरण कार्यकर्ते झोरु बाथेना यांचे म्हणणे ऐकल्यावर ‘पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामाविषयी प्रश्न उपस्थित झाल्याचे मत व्यक्त केले आहे. यावेळी कुमार आणि बथेना यांनी ही बाब न्यायाधिकरणाच्या निदर्शनास आणली की, पर्यावरणाला हानिकारक असलेली ही समुद्री भित बीचच्या मधोमध उभारली असून, तिच्यामुळे सीआरझेड नियमांचेदेखील उल्लंघन होत आहे. 

ही भिंत महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) मंजुरीचेदेखील उल्लंघन करत आहे. एमसीझेडएमएने बीचवर कोणत्याही प्रकारच्या बांधकामावर प्रतिबंध केला आहे. केवळ बीच आणि सीआरझेड २ च्या जमिनीकडच्या भागावरच ’सुशोभिकरणाला’ परवानगी दिली आहे. याआधी मेरिटाईम बोर्डाकडे आवश्यक त्या मंजुरी असल्याचा दावा करणारे एमएमबीचे वकील साकेत मोने यांनी नंतरच्या आदेशानुसार एनजीटीकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यांनी ४ मार्च २०१९ रोजीच्या सीआरझेड मंजुरीचा उल्लेख केला होता.

मेरिटाईम बोर्डास मोठा धक्काया संदर्भातील पुढची आता सुनावणी ४ सप्टेंबर २०२३ रोजी ठेवली आहे. एनजीटीचे दिनेशकुमार आणि विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावली झाली. एनजीटीने पर्यावरणवाद्यांची ही याचिका स्वीकारल्याने मेरिटाईम बोर्डास मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई