शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमधून जलवाहतुकीला नवीन वर्षाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:38 IST

Navi Mumbai : रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला नवी मुंबई ते मुंबईदरम्यानचा सागरी प्रवास आता दृष्टिपथात आला आहे. नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने मे, २0२१चा मुहूर्त निश्चित केला आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू आहे.रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी आणि मेरिटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, २0१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे १११ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. असे असले, तरी मागील काही महिन्यांपासून जेट्टीच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या महिन्यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यानुसार, पुढील पाच-सहा महिन्यांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पुढील चार-पाच महिन्यांत नेरुळ जेटीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर, या जेट्टीचे मेरिटाइम बोर्डाकडे हस्तांतरण करण्यात येईल. एकूणच मे, २0२१ मध्ये नवी मुंबई ते मुंबईदरम्यान सागरी मार्गाचा प्रवासी वाहतुकीचा पहिला  टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने जलवाहतुकीचा पर्याय सर्वोत्तम मानला जात आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे.  

पहिल्या टप्प्यातील काम या जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नेरुळ जेट्टीचा विकास केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या टप्प्यात वाशी आणि बेलापूर येथील जेट्टी प्रस्तावित आहेत. या तिन्ही जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईसह अलिबागसुद्धा नवी मुंबईला जलमार्गाद्वारे जोडण्याची योजना आहे. 

सरकारची योजनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग  आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे. हे जलमार्ग सुरू झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, तसेच प्रवासी वाहतुकीच्या  कंटाळवाणा प्रवासाचा  कालावधीसुद्धा काही तासांनी कमी होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई