शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

नेरुळमधून जलवाहतुकीला नवीन वर्षाचा मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 02:38 IST

Navi Mumbai : रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत.

नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला नवी मुंबई ते मुंबईदरम्यानचा सागरी प्रवास आता दृष्टिपथात आला आहे. नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जलवाहतूक सुरू करण्यासाठी सिडकोने मे, २0२१चा मुहूर्त निश्चित केला आहे. त्या दृष्टीने संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू आहे.रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतूक यंत्रणा निर्माण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जेएनपीटी आणि मेरिटाइम बोर्ड यांच्या संयुक्त सहकार्यातून सिडकोने नवी मुंबई ते मुंबईदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात नेरुळ येथे जेट्टी उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एप्रिल, २0१८ मध्ये या जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे १११ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु कोरोनाचा संसर्ग आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम काही प्रमाणात रखडले होते. असे असले, तरी मागील काही महिन्यांपासून जेट्टीच्या कामाने वेग घेतला आहे. गेल्या महिन्यात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी केली होती. त्यानुसार, पुढील पाच-सहा महिन्यांत जेट्टीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. पुढील चार-पाच महिन्यांत नेरुळ जेटीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर, या जेट्टीचे मेरिटाइम बोर्डाकडे हस्तांतरण करण्यात येईल. एकूणच मे, २0२१ मध्ये नवी मुंबई ते मुंबईदरम्यान सागरी मार्गाचा प्रवासी वाहतुकीचा पहिला  टप्पा सुरू करण्याची सिडकोची योजना आहे. वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने जलवाहतुकीचा पर्याय सर्वोत्तम मानला जात आहे. त्यानुसार, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे.  

पहिल्या टप्प्यातील काम या जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नेरुळ जेट्टीचा विकास केला जात आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या टप्प्यात वाशी आणि बेलापूर येथील जेट्टी प्रस्तावित आहेत. या तिन्ही जेट्टीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईसह अलिबागसुद्धा नवी मुंबईला जलमार्गाद्वारे जोडण्याची योजना आहे. 

सरकारची योजनामुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग  आणि मांडवा ही शहरे जलमार्गाने जोडण्याची सरकारची योजना आहे. हे जलमार्ग सुरू झाल्यानंतर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे, तसेच प्रवासी वाहतुकीच्या  कंटाळवाणा प्रवासाचा  कालावधीसुद्धा काही तासांनी कमी होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई