शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केटसाठी आता नवीन नियमावली!; बाजार समितीमध्ये सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:19 IST

बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

नवी मुंबई : मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करता यावा, यासाठी बाजार समितीमधील पाचही मार्केट सुरूच राहणार आहेत. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी मार्केटची वेळ रात्री २ ते सकाळी १० ऐवजी रात्री १० ते सकाळी १० अशी करण्यात आली आहे. मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे.बाजार समितीमध्ये सर्वाधिक गर्दी भाजीपाला मार्केटमध्ये होत असते. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी महासंघ व बाजार समिती प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. मार्केटमध्ये किरकोळ विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. ग्राहकांना पालेभाज्यांची किमान एक गोण खरेदी करावी लागणार आहे. फळभाज्या किमान १० किलोपेक्षा जास्त खरेदी कराव्या लागणार आहेत. मार्केटमध्ये सायंकाळी सहा ते पहाटे पाचपर्यंत कृषी मालाची आवक सुरू राहणार आहे. रात्री १० ते सकाळी दहापर्यंत व्यापार करता येणार आहे. मार्केटमध्ये आलेली वाहने तीन तासात बाहेर गेली पाहिजेत. मोटारसायकल, कार या खासगी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. अडते, व्यापारी यांनी त्यांच्या गाळ्यामध्ये सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक आहे.मार्केटमधील किरकोळ व्यापार बंद करण्यात आला असून, मोटारसायकल व कारना मार्केटमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाजार समितीमध्ये ४५ वर्षांवरील सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड आकारण्यात येणार आहे.  मार्केटमध्ये एकावेळी २००पेक्षा जास्त ग्राहकांना सोडले जाणार नाही. मार्केटमध्ये चार गेटच सुरू ठेवले जाणार असून, इतर बंद केली जाणार आहेत. मार्केटमध्ये प्रत्येक गाळ्यात व्यापारी व एक मदतनीस यांनाच थांबता येणार आहे. रोजंदारीवर काम करणारांचीही अँटिजेन चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.बाजार समितीमध्ये आवक वाढलीलॉकडाऊनच्या शक्यतेमुळे भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी तब्बल ६९१ वाहनांची आवक झाली होती. सोमवारीही ६६१ वाहनांची आवक झाली आहे. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर १५ टक्केे कमी झाले आहेत. मंगळवारपासून नियंत्रित आवक सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार सुरळीत सुरू राहील. याकडे लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक मार्केटमध्ये सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून, भाजी मार्केटसाठी विशेष नियमावली लागू केली आहे.     - संदीप देशमुख, प्रभारी सचिव, एपीएमसीभाजी मार्केटसाठी नवीन नियमावली तयार केली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असून, मुंबई, नवी मुंबईकरांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा करण्यात येणार आहे.     - शंकर पिंगळे, संचालक, भाजी मार्केट

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती