शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर 

By नारायण जाधव | Updated: January 13, 2023 22:22 IST

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उद्योग विभागाने एमआयडीसीतील पाच प्रकल्पांकरिता १४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

नवी मुंबई शहरात टीसीसी औद्योगिक वसाहतीस आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच बाजार पेठांमध्ये दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. याशिवाय जेएनपीटी बंदराकडे जाणारी शेकडो वाहनेही शहरातून जातात. मात्र, या वाहनांना विसाव्यासाठी शहरांत कोठेही वाहनतळ नाही. यामुळे शहरात जागोजागी ती उभी करण्यात येत असल्याने होणाऱ्या वाहतूककोंडीवर उतारा म्हणून एमआयडीसी लवकरच नवे वाहनतळ बांधणार आहे. या वाहनतळासाठी केंद्र शासनाने आपल्या पंतप्रधान गतिशक्ती योजनेतून ३० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे.

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उद्योग विभागाने एमआयडीसीतील पाच प्रकल्पांकरिता १४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा निधी गुरुवारी वितरित करण्यात आला आहे. यात नवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीतील ट्रक टर्मिनल अर्थात वाहनतळांकरिता ३० कोटी रुपये वितरित केले आहेत. यामुळे लवकरच या कामास एमआयडीसीकडून सुरुवात होऊ शकते.

शहरात रोज आठ हजार वाहनेनवी मुंबईतील टीटीसी औद्योगिक वसाहतीत साडेतीन हजारांहून छोट्यामोठ्या कंपन्या आहेत. येथे दररोज चार ते साडेचार वाहनांची ये-जा असते. याशिवाय मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ, साखर-मसाला आणि दाणाबंदर-१ व २ या पाच बाजार पेठांमध्येही दररोज तीन ते चार हजार वाहने येतात. याशिवाय देशभरातून जेएनपीटी बंदरात ये-जा करणारी काही वाहने अनेकदा नवी मुंबईत विसावा घेतात.

एकमेव ट्रक टर्मिनलच्या जागेवर आवास योजनाशहरात एपीएमसीला लागूनच सिडकोने ट्रक टर्मिनल बांधले होते. मात्र, कोणालाही विचारात न घेता आणि जागा वापरात बदल न करता सिडकोने त्यावर पीएम आवास याेजनेच्या घरांचे नियमबाह्य काम हाती घेतले आहे.

स्थानिक भाई, नाना, दादांचे संरक्षण -एकमेव ट्रक टर्मिनल बंद झाल्याने तिथे उभी राहणारी वाहने आता बिनधास्तपणे रस्त्यांवर उभी करण्यात येत आहेत. त्यांच्याकडून स्थानिक भाई, नाना,दादा नावांचे कथित समाजसेवक पार्किंग शुल्काची वसुली करून त्यांना संरक्षण देत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांचीही त्यांच्यासोबत हातमिळवणी आहे. मात्र, यामुळे होणाऱ्या कोंडीने नवी मुंबईकरांचा जीव गुदमरत आहे.

या पाच प्रकल्पांना मिळाले १४५ कोटी -टीटीसीतील ट्रक टर्मिनल ३० कोटी, नवापूर एमआयडीसील रस्ता रुंदीकरण ४० कोटी, तळेगाव एमआयडीसीला जोडणारा नवा रस्ता २० कोटी, खर्डी-शहापूर येथील लाॅजिस्टिक पार्क ४५ कोटी आणि मुंबईत पीएम गतिशक्तीसाठी बांधण्यात येणाऱ्या डाटा सेंटर १० कोटी. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडीParkingपार्किंग